शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:22 IST

मुख्य रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’कंपनीच्या प्रतिनिधींना दिले होते. कंपनीने प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला ठेंगा दाखवत अद्यापपर्यंतही रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे सद्यस्थितीत शहराच्या प्रमुख रस्त्यांलगतचा भाग खोदून जलवाहिनी टाकल्या जात आहे. खोदकाम केलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित असताना मागील तीन ते चार महिन्यांपासून कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीला प्रारंभ केला नसल्याचे समोर आले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीचा खर्च मनपा प्रशासनाकडून अदा केला जाणार असल्याची माहिती आहे.

अकोला: ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून शहरात नवीन जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. यासाठी खोदण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’कंपनीच्या प्रतिनिधींना दिले होते. कंपनीने प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला ठेंगा दाखवत अद्यापपर्यंतही रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला नसल्याचे चित्र आहे. या कामावर तांत्रिक सल्लागार म्हणून कर्तव्य बजावणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मनपाच्या जलप्रदाय विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत योजने’च्या माध्यमातून शहरात भूमिगत गटार योजना व संपूर्ण शहराची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही कामांवर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले. शहरात पहिल्या टप्प्यात ८७ कोटी रुपयांतून जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा कंत्राट ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला देण्यात आला आहे. १४७ किलोमीटर महान धरण ते अकोला शहरापर्यंत आणि २६५ किलोमीटर शहरातील अंतर्गत भागात नवीन जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. सद्यस्थितीत शहराच्या प्रमुख रस्त्यांलगतचा भाग खोदून जलवाहिनी टाकल्या जात आहे. खोदकाम केलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित असताना मागील तीन ते चार महिन्यांपासून कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीला प्रारंभ केला नसल्याचे समोर आले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीचा खर्च मनपा प्रशासनाकडून अदा केला जाणार असल्याची माहिती आहे. सध्या पावसाचे दिवस लक्षात घेता व ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांची दुरवस्था पाहता कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीला प्रारंभ करण्याची मागणी अकोलेकर करीत आहेत.आयुक्तांच्या आदेशानंतर किती रस्त्यांची दुरुस्ती?जलवाहिनीचे जाळे टाकल्यानंतर संबंधित रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दोन महिन्यांपूर्वी आधी रस्ते दुरुस्त करा, त्यानंतरच नवीन जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा आदेश कंत्राटदाराला दिला होता. या दोन महिन्यांच्या कालावधीत कंत्राटदाराने किती रस्त्यांची दुरुस्ती केली, याचा मनपाकडे कोणताही लेखाजोखा नसल्याची माहिती आहे.

सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची चुप्पी!जलवाहिनीचे जाळे टाकणाºया कंपनीकडून मुख्य रस्त्यांची ऐशीतैशी केली जात असताना त्याला आवर घालण्याची जबाबदारी असणाºया सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्ष काँग्रेसने चुप्पी साधणे पसंत केले आहे. तोंडावर बोट ठेवण्यासाठी नेमका कोणता व्यवहार पार पडला, याबद्दल अकोलेकरांमध्ये चर्चेला ऊत आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका