शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

वान धरणातून अकोल्याला मिळणार पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:35 IST

आता पाणी आणण्यासाठी महापालिकेला तातडीचे नियोजन करण्याची गरज आहे.

- राजरत्न सिरसाट,अकोला : अकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात यावर्षी अल्प जलसाठा असल्याने अकोल्यावर जलसंकट निर्माण झाले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत वान धरणात २४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण करण्याचा निर्णय घेतला असून, एका परिपत्रकान्वये पाटबंधारे विभागाला पाणी आरक्षणाचा आदेश दिला आहे. आता पाणी आणण्यासाठी महापालिकेला तातडीचे नियोजन करण्याची गरज आहे.केवळ पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी काटेपूर्णा धरणात कि मान ३५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच अकोल्यासह ६४ खेडी व मूर्तिजापूरला पाणी पुरवठा करता येईल; परंतु काटेपूर्णा धरणात आजमितीस १०.५० टक्केच जलसाठा उपलब्ध असून, या पाण्यात पाच ते सहा महिनेच अकोलेकरांची तहान भागू शकते. अकोलेकरांवरील आलेले जलसंकट बघता, शासनाने अमृत अभियान अकोला शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत अकोलकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वान धरणात २४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण केले आहे. महाराष्टÑ जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम २०११ यातील कलम ५ मधील १६ (क) नुसार जलसंपत्ती प्रकल्पामधील पाण्याचे क्षेत्रीय वाटप राज्यमंत्री मंडळाकडूनच करण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार पिण्याच्या व औद्योगिक वापराच्या बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार मंत्रिमंडळ उपसमितीला देण्यात आले आहेत. यानुसारच, अमृत अभियानांतर्गत अकोला शहर वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, वान नदी धरणातून अकोल्याला २४ दलघमी पाणी मिळणार आहे.या निर्णयानुसार भविष्यात दुष्काळी परिस्थितीत पाणी कपातीत सामोरे जावे लागल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार पाणी कपातीबाबतची जबाबदारी अकोला महापालिकेची असून, अकोला जिल्ह्यात कुठलाही पर्यायी शाश्वत उदभव उपलब्ध नसल्यामुळे अवर्षण वर्षात नियमित पाणी पुरवठा करणे शक्य नसल्यास उद्भवणाºया परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणी घेण्यास महापालिका बांधील राहणार आहे.

वान धरणात ८९.७१ टक्के पाणीअकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या वान धरणाची जलाशय पातळी ४१०.२६ मीटर असून, आजचा उपयुक्त जलसाठा ७३.४७ दशलक्ष घनमीटर ८९.७१ टक्के आहे. दोन दिवसांपासून या पर्वतरांगांवर पाऊस सुरू असल्याने या धरणाचे गुरुवार, ५ सप्टेंबर रोजी दोन वक्रद्वार उघडण्यात आले आहेत. यातून ४० से.मी.चा विसर्ग होत आहे.तर यावर्षी सिंचनाला पाणी नाही!सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी धरणात ५० टक्के जलसाठा असावा लागतो. तथापि, काटेपूर्णा धरणात आजमितीस १०.५० टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी या धरणाच्या सिंचन क्षेत्रात येणाºया शेतीला पाणी मिळणार नाही. वान धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे अकोल्याला २४ दलघमी पाणी दिले तरी अकोल्यासाठीचा वापर किती होतो, हे सांगता येत नाही. त्यामुळे वान धरणातून सिंचनासाठी कोणताही अडथळा निर्माण होईल, असे वाटत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 पर्यायी व्यवस्था करावीच लागणार!शहर वाढल्याने अकोलेकरांची पाण्याची मागणी वाढली आहे. दरडोही १४० लीटर पाणी गरज बघता काटेपूर्णा धरणाची क्षमता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आपल्याकडे सततची पावसाची अनिश्चितता, काटेपूर्णा धरणात अर्धा गाळ साचलेला आहे. वान धरण छोटे आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था जळगाव जिल्ह्यातील हातनूर किंवा अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातून करावी लागणार आहे. असा प्रस्तावही याअगोदर मनपाने केला होता.

पिण्याच्या पाण्यासाठी किमान ३५ टक्के पाणी काटेपूर्णा धरणात असावे लागते. तथापि, आजमितीस या धरणात अल्प जलसाठा आहे; परंतु पावसाची शक्यता बघता येत्या महिन्यात यामध्ये २० टक्के पाणी संचय होण्याची शक्यता आहे. वान धरणातून २४ दलघमीचे आरक्षण करण्यात आले आहे.- चिन्मय वाकोडे,कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWan Projectवान प्रकल्पTelharaतेल्हारा