शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अकोला : पाण्यासाठी रात्रीचा दिवस; खानापूर येथे भीषण पाणी टंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 02:12 IST

खानापूर : येथे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी महिलांवर रात्रीचा दिवस करण्याची पाळी आली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

ठळक मुद्देजलस्रोत आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी उन्हात भटकंती

रमेश निलखन । लोकमत न्यूज नेटवर्कखानापूर : येथे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी महिलांवर रात्रीचा दिवस करण्याची पाळी आली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास असून, सार्वजनिक सात विहिरी आहेत. ११ हातपंप असून, त्यामधून नऊ हातपंपांचे पाणी आटलेले आहे, तर सर्व विहिरींचे पाणी मार्च महिन्यातच आटलेले आहे. दोन हातपंपांवर ग्रा.पं.ने मोटारपंप बसविले असून, त्यातीलही एक हातपंप आटून गेला असल्यामुळे आता केवळ एकाच हातपंपावर ग्रामस्थांची मदार आहे. सदर हातपंपावर गावात ४ तर १ इंदिरा नगरात प्रति दोन हजार लीटर क्षमता असलेल्या टाक्या बसविल्या आहेत. एका बोअरवेलवर तेही पावसाळ्यापर्यंत तहान भागविणे अशक्यप्राय आहे. दिवसाला एकच वेळ या पंपावरून पाणी सोडल्या जात असून, हा बोअरवेलही उपशावर आला आहे. पाण्याची टंचाई ही एका वॉर्डापुरती र्मयादित नसून, पूर्ण गावाला याची झळ सोसावी लागत आहे. गावकर्‍यांचा मुख्य व्यवसाय हा शेती व शेतमजुरी असून, महिलांचा बराचसा वेळ पाण्यासाठी खर्च होत आहे. गावामध्ये जवळपास ४0 टक्के नागरिकांनी घरगुती बोअरवेल घेतलेले असून, सदर बोअरही आटून गेले आहे. गावाचे दक्षिणेस घनदाट असा जंगल असून, उर्वरित दोन बाजूने टेकड्या आहेत. त्यामुळे साहजिकच हे गाव खोलगट भागात आहे. दोन गावांतून तर दोन नाले गावाला लागूनच बाहेरून गेले आहेत. पावसाळ्यात पाणी येते आणि नाल्याने धो-धो वाहून जाते. त्याला कुठे गतिरोधकच नसल्यामुळे वाहून जाण्याशिवाय पर्याय नाही. अतवृष्टी झाल्यास नाल्याचे पाणी घरात प्रवेश करून नुकसान होते. सदर चारही नाल्यांवर जंगलामध्ये वनतळ्याची निर्मिती करून पाणी अडविल्यास ग्रामस्थांची गावाकडे असलेली धाव थांबेल आणि महत्त्वाचे म्हणजे गावातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे विहिरींना आणि हातपंपांना पाणी राहील. म्हणजे गावात भविष्यात पाण्याची टंचाई कधीही भासणार नाही. पुन्हा सिंचन क्षेत्रातही भरघोस अशी वाढ होईल, असे या वनतळ्यापासून चार फायदे आहेत; परंतु याकडे ग्रामपंचायत स्तरावरून काहीही विशेष अशी हालचाल दिसत नाही.

हातपंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष पातूर आणि बाळापूर या दोन तालुक्यांसाठी हातपंप दुरुस्तीकरिता एकच गाडी पं. स. स्तरावर आहे. गावातील हातपंप रिपेरिंग केल्यास निम्मे हातपंप सुरू होणार आहे. याकडे वरिष्ठांचेही दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पाणी टंचाईची झळ मानवासोबतच गुराढोरांना जास्तच पोहोचत आहे. गावातील अनेक हातपंप बंद पडलेले आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता आणखी वाढली आहे. 

मोर्णाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्याची मागणी६ एप्रिल रोजी मोर्णा प्रकल्पाचे पाणी मोर्णा नदीला सोडण्यात आले. तसेच मायनर एकपर्यंत कालव्यालाही सोडण्यात आले; परंतु मायनर एकपर्यंत केवळ पास्टुल, आस्टुल व लोणारी खुर्द या तीन गावांचाच समावेश होत असल्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या खानापूर गावाला याचा कोणताही लाभ होऊ शकत नाही. गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, हा यामागील उद्देश असून, कालव्याला सोडलेले पाणी कोठारी मार्गे चेलका या गावाकडे नदीमध्ये वळते करण्यात आल्याची माहिती आहे. सदर समस्या ही केवळ वरील तीन गावांचीच नसून, या समस्येने परिसरात खानापूर या गावाला विशेषकरून गंभीर स्वरूपाने ग्रासले आहे. मायनर दोनपर्यंत कालव्याला पाणी सोडल्यास गुरांसाठी पाण्याची व्यवस्था होऊन पाणी टंचाईवर काही प्रमाणात उपाययोजना होईल. 

फळबागा सुकल्या या टंचाईचा परिणाम फळबागांवर होत असून, पांडुरंग ठाकरे यांची दोन हजार डाळिंबाची तर परसराम निलखन यांची लिंबूची झाडे वाळली आहेत. यांच्यासह बर्‍याच शेतकर्‍यांच्या फळबागांवर या प्रकारची संक्रांत आली आहे. भरघोस उत्पन्न मिळेल, या आशेने अमाप खर्च करून लहान बालकाप्रमाणे झाडांची निगा राखल्यानंतर त्या झाडावर कुर्‍हाड चालविण्याची दुर्दैवी वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. वरील संभाव्य बाबीचा विचार करून टँकरची तात्पुरती आणि कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाwater shortageपाणीटंचाई