शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : पाण्यासाठी रात्रीचा दिवस; खानापूर येथे भीषण पाणी टंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 02:12 IST

खानापूर : येथे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी महिलांवर रात्रीचा दिवस करण्याची पाळी आली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

ठळक मुद्देजलस्रोत आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी उन्हात भटकंती

रमेश निलखन । लोकमत न्यूज नेटवर्कखानापूर : येथे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी महिलांवर रात्रीचा दिवस करण्याची पाळी आली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास असून, सार्वजनिक सात विहिरी आहेत. ११ हातपंप असून, त्यामधून नऊ हातपंपांचे पाणी आटलेले आहे, तर सर्व विहिरींचे पाणी मार्च महिन्यातच आटलेले आहे. दोन हातपंपांवर ग्रा.पं.ने मोटारपंप बसविले असून, त्यातीलही एक हातपंप आटून गेला असल्यामुळे आता केवळ एकाच हातपंपावर ग्रामस्थांची मदार आहे. सदर हातपंपावर गावात ४ तर १ इंदिरा नगरात प्रति दोन हजार लीटर क्षमता असलेल्या टाक्या बसविल्या आहेत. एका बोअरवेलवर तेही पावसाळ्यापर्यंत तहान भागविणे अशक्यप्राय आहे. दिवसाला एकच वेळ या पंपावरून पाणी सोडल्या जात असून, हा बोअरवेलही उपशावर आला आहे. पाण्याची टंचाई ही एका वॉर्डापुरती र्मयादित नसून, पूर्ण गावाला याची झळ सोसावी लागत आहे. गावकर्‍यांचा मुख्य व्यवसाय हा शेती व शेतमजुरी असून, महिलांचा बराचसा वेळ पाण्यासाठी खर्च होत आहे. गावामध्ये जवळपास ४0 टक्के नागरिकांनी घरगुती बोअरवेल घेतलेले असून, सदर बोअरही आटून गेले आहे. गावाचे दक्षिणेस घनदाट असा जंगल असून, उर्वरित दोन बाजूने टेकड्या आहेत. त्यामुळे साहजिकच हे गाव खोलगट भागात आहे. दोन गावांतून तर दोन नाले गावाला लागूनच बाहेरून गेले आहेत. पावसाळ्यात पाणी येते आणि नाल्याने धो-धो वाहून जाते. त्याला कुठे गतिरोधकच नसल्यामुळे वाहून जाण्याशिवाय पर्याय नाही. अतवृष्टी झाल्यास नाल्याचे पाणी घरात प्रवेश करून नुकसान होते. सदर चारही नाल्यांवर जंगलामध्ये वनतळ्याची निर्मिती करून पाणी अडविल्यास ग्रामस्थांची गावाकडे असलेली धाव थांबेल आणि महत्त्वाचे म्हणजे गावातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे विहिरींना आणि हातपंपांना पाणी राहील. म्हणजे गावात भविष्यात पाण्याची टंचाई कधीही भासणार नाही. पुन्हा सिंचन क्षेत्रातही भरघोस अशी वाढ होईल, असे या वनतळ्यापासून चार फायदे आहेत; परंतु याकडे ग्रामपंचायत स्तरावरून काहीही विशेष अशी हालचाल दिसत नाही.

हातपंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष पातूर आणि बाळापूर या दोन तालुक्यांसाठी हातपंप दुरुस्तीकरिता एकच गाडी पं. स. स्तरावर आहे. गावातील हातपंप रिपेरिंग केल्यास निम्मे हातपंप सुरू होणार आहे. याकडे वरिष्ठांचेही दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पाणी टंचाईची झळ मानवासोबतच गुराढोरांना जास्तच पोहोचत आहे. गावातील अनेक हातपंप बंद पडलेले आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता आणखी वाढली आहे. 

मोर्णाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्याची मागणी६ एप्रिल रोजी मोर्णा प्रकल्पाचे पाणी मोर्णा नदीला सोडण्यात आले. तसेच मायनर एकपर्यंत कालव्यालाही सोडण्यात आले; परंतु मायनर एकपर्यंत केवळ पास्टुल, आस्टुल व लोणारी खुर्द या तीन गावांचाच समावेश होत असल्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या खानापूर गावाला याचा कोणताही लाभ होऊ शकत नाही. गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, हा यामागील उद्देश असून, कालव्याला सोडलेले पाणी कोठारी मार्गे चेलका या गावाकडे नदीमध्ये वळते करण्यात आल्याची माहिती आहे. सदर समस्या ही केवळ वरील तीन गावांचीच नसून, या समस्येने परिसरात खानापूर या गावाला विशेषकरून गंभीर स्वरूपाने ग्रासले आहे. मायनर दोनपर्यंत कालव्याला पाणी सोडल्यास गुरांसाठी पाण्याची व्यवस्था होऊन पाणी टंचाईवर काही प्रमाणात उपाययोजना होईल. 

फळबागा सुकल्या या टंचाईचा परिणाम फळबागांवर होत असून, पांडुरंग ठाकरे यांची दोन हजार डाळिंबाची तर परसराम निलखन यांची लिंबूची झाडे वाळली आहेत. यांच्यासह बर्‍याच शेतकर्‍यांच्या फळबागांवर या प्रकारची संक्रांत आली आहे. भरघोस उत्पन्न मिळेल, या आशेने अमाप खर्च करून लहान बालकाप्रमाणे झाडांची निगा राखल्यानंतर त्या झाडावर कुर्‍हाड चालविण्याची दुर्दैवी वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. वरील संभाव्य बाबीचा विचार करून टँकरची तात्पुरती आणि कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाwater shortageपाणीटंचाई