शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

अकोला : महाबीजच्या सोलर शीतगृहात भाजीपाला बियाण्यांचे होणार संवर्धन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 14:33 IST

अकोला : सोलर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) हा उपक्रम असून, संकरित भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे.

ठळक मुद्देसोलर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. संकरित भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे.राज्यातील बहुदा हे एकमेव सोलरवर चालणारे शीतगृह असेल, असे सांगण्यात येत आहे.

अकोला : सोलर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) हा उपक्रम असून, संकरित भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे. यामुळे राज्यातील शेतकºयांना राज्यातच भाजीपाला बियाणे मिळणार आहे. हे शीतगृह बांधण्याचे काम सुरू असून, सोलरवरील हे राज्यातील पहिले शीतगृह असल्याचे वृत्त आहे.महाबीजने राज्यात गोदामांची शृंखला तयार केली असून, शेतकºयांना बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठीचे हे नियोजन करण्यात आले आहे. हायब्रीड भाजीपाला बियाणे उत्पादनावर भर देण्यात येत आहे. यासाठी लागणारे बियाणे शीतगृहात ठेवावे लागतात. याच पृष्ठभूमीवर महाबीजने शीतगृह उभारणीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सोलर विजेवर हे शीतगृह निर्माण करण्यात येणार आहे. महाबीजच्या मुख्यालयांतर्गत शिवणी येथे शीतगृह उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुदा हे एकमेव सोलरवर चालणारे शीतगृह असेल, असे सांगण्यात येत आहे.राज्यात महाबीजची २३ जिल्ह्यांत कार्यालये आहेत. उर्वरित जिल्ह्यातही जागा मागणीचा प्रस्ताव महाबीजने तयार केला असून, शासनामार्फत जिल्हाधिकाºयांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. शेतमालावर प्रक्रिया आवश्यक असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांत प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच या सर्व ठिकाणी गोदाम निर्मिती केली जाणार आहे. 

संकरित भाजीपाल्यावर भरभाजीपाल्याची वाढती गरज बघता, महाबीज आता संकरित भाजीपाला निर्मितीसाठी भाजीपाला बियाणे निर्मितीवर भर देत आहे. त्यासाठीच शीतगृहाची गरज असल्याने या शीतगृह उभारणीचा निर्णय घेतला असून, सोलर शीतगृहाचे बांधकाम अकोल्यात सुरू आहे.-संकरित भाजीपाला संशोधनावर भर देण्यात आला आहे. या बियाण्यांची थंड ठिकाणी साठवण करावी लागते. तसेच मूळ संशोधित बियाणेदेखील थंड ठिकाणी ठेवावे लागते. यासाठीच शीतगृह उभारण्यात येत आहे. या शीतगृहाचे काम लवकरच पूर्ण होत आहे.- ओमप्रकाश देशमुख,व्यवस्थापकीय संचालक,महाबीज,अकोला.