शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

यंदाही बारावीच्या परीक्षेत पुन्हा मुलांपेक्षा मुलीच वरचढ; एकूण निकाल ९१.८५ टक्के

By नितिन गव्हाळे | Updated: May 25, 2023 15:50 IST

बारावीच्या परीक्षेत ११ हजार ८०० मुले तर १० हजार ८३९ मुली उत्तीर्ण झाले आहेत.

अकोला : राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीचा निकाल २५ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलींनीच आघाडी मिळविली आहे. अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९१.८५ टक्के लागला असून, यात मुलींची टक्केवारी ९४.७० टक्के एवढी आहे. यंदा झालेल्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले.

जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी १३ हजार २६७ मुले, ११ हजार ४९९ मुली अशा एकूण २४ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार २०१ मुले व ११ हजार ४४५ मुली अशा एकूण २४ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी ८६ केंद्रांवरून परीक्षा दिली हाेती. एकंदरीतच बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा उत्कृष्ट निकाल लागला आहे. या निकालामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींनी अपेक्षेनुसार आघाडी मिळविली आहे.

जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा सरस आहे. बारावीच्या परीक्षेत ११ हजार ८०० मुले तर १० हजार ८३९ मुली उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा दरवर्षीप्रमाणे भरघोस निकाल लागला असून, विज्ञान शाखेचे ९८.२८ टक्के विद्यार्थी पास झाले. त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा ९५.७० टक्के, कला शाखेचा निकाल ८५.७७ टक्के तर व्होकेशनल शाखेचा निकाल ८२.०२ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांचा निकाल उत्कृष्ट लागला असून, विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत निकाल घसरलागतवर्षी बारावीच्या परीक्षेचा निकालाची टक्केवारी घसरली असून, गतवर्षी अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.८४ टक्के लागला होता. यात मुलींची टक्केवारी ९७.१५ टक्के होती. यंदा हा निकाल ९१.८५ टक्के लागला आहे.

निकालात बार्शीटाकळी तालुका अव्वलबारावीच्या निकालात जिल्ह्यातून बार्शीटाकळी तालुक्याने अव्वल स्थान पटकावले. बार्शीटाकळी तालुक्याचा निकाल ९६.१५ टक्के लागला आहे तर पातूर तालुक्याचा निकाल ९६.०९ टक्के लागला आहे. त्यानंतर मूर्तिजापूर तालुका ९३.७० टक्के तर अकोला तालुक्याचा निकाल ९२.२३ टक्के लागला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल