शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तीन हजार रुपयांसाठी अकोलेकर तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 13:55 IST

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगरपर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडण्याची गरज निर्माण झाली आहे.

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगरपर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडण्याची गरज निर्माण झाली आहे. हा मार्ग ओलांडण्यासाठी भूमिगत जलवाहिनीचा पर्याय असून, रेल्वे प्रशासनाच्या परवागीसाठी आॅनलाइन अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर करण्यासाठी मनपा प्रशासनाकडे शुल्कापोटी तीन हजार रुपये नसल्यामुळे की काय, ‘अमृत’च्या कामाला खीळ बसली आहे. परिणामी, अवघ्या तीन हजार रुपयांसाठी शहरवासी तहानलेले असल्याचे चित्र समोर आले आहे.‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. त्यामध्ये जलकुंभाची उभारणी करण्यासह नागरिकांच्या घरापर्यंत जलवाहिनीचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगर भागात जलवाहिनीचे जाळे नाही. हातपंपांच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने ते पिण्यायोग्य नसल्याची परिस्थिती आहे. अशा स्थितीत नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागते. ‘अमृत’च्या माध्यमातून जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असल्याने प्रभाग तीनमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. यादरम्यान, रेल्वे मार्ग ओलांडून भूमिगत पद्धतीने जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तीन हजार रुपये शुल्क जमा करावे लागते. अशाप्रमाणे किमान पाच ते सहा ठिकाणी भूमिगत जलवाहिनीचे जाळे टाकावे लागेल. सदर कामासाठी मनपा प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी जलप्रदाय विभागात सेवानिवृत्त शाखा अभियंता डी. के. राऊत यांच्याकडे जबाबदारी दिली होती; परंतु ‘अमृत’च्या कामात शुल्क भरण्याची तरतूद नसल्याची सबब पुढे करून आजपर्यंतही रेल्वे प्रशासनाकडे अर्ज सादर करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, प्रभाग तीनमधील नागरिकांपर्यंत जलवाहिनीचे जाळे पोहोचू शकत नसल्याचे चित्र आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने दखल घेण्याची मागणी भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.अर्ज सादर करण्यास विलंबभूमिगत पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे अर्ज सादर केल्यानंतर परवानगीसाठी किमान ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सदर अर्ज सादर करण्यासाठी जलप्रदाय विभागाकडून जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका