शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

अकोला : शहरात नव्याने टाकण्यात येणार्‍या जलवाहिनीची ‘टेस्टिंग’; पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:33 AM

अकोला : शहरात नव्याने टाकण्यात येणार्‍या जलवाहिन्यांची ‘टेस्टिंग’ घेतली जात असली, तरी संबंधित कंत्राटदार, त्यावर देखरेख ठेवणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची यंत्रणा व मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र केशव नगरासह अनेक ठिकाणी  दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरावर जलसंकटाचे सावट; अकोलेकर ‘बेपर्वा’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात नव्याने टाकण्यात येणार्‍या जलवाहिन्यांची ‘टेस्टिंग’ घेतली जात असली, तरी संबंधित कंत्राटदार, त्यावर देखरेख ठेवणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची यंत्रणा व मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र केशव नगरासह अनेक ठिकाणी  दिसून येत आहे. महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, शहरावर जलसंकटाचे सावट असल्याची जाणीव असतानासुद्धा प्रशासकीय यंत्रणेसोबतच अकोलेकरदेखील पाण्याच्या नासाडीबाबत कमालीचे बेपर्वा असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात जलवाहिन्यांचे नवीन जाळे, जलकुंभ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. सदर कामाचा कंत्राट ‘एपी अँण्ड जीपी’ कंपनीकडे असून, कंपनीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली आहे. योजनेच्या एकूण किमतीच्या बदल्यात एमजेपीला तीन टक्के रक्कम अदा केली जाणार आहे. शासनाने एमजेपीवर जबाबदारी निश्‍चित केली असली, तरी प्रत्यक्षात जलवाहिन्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यात शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय, जुन्या जलवाहिन्यांच्या बाजूला नवीन जलवाहिनी टाकल्यानंतर नागरिकांना दिल्या जाणार्‍या कनेक्शनमधून दाबाने पाणी पुरवठा होतो किंवा नाही, याची चाचपणी घेतली जात असताना पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत आहे. ऐन उन्हाळ्य़ाच्या दिवसांत पाण्याचे धो-धो लोट वाहत असल्यामुळे या नासाडीला जबाबदार कोण, या प्रकाराला महापालिका प्रशासन आळा घालेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

नासाडीची काळजी का नाही?निसर्गनिर्मित असणारे पाणी कृत्रिमपणे तयार करण्याचा अद्यापही शोध लागला नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी नागरिकांना किमान दोनशे ते चारशे फूट खोलपर्यंत बोअर खोदाव्या लागत आहेत. नवीन जलवाहिनीचे कनेक्शन उघडे असले तरी त्याला तोटी लावता येणे सहज शक्य आहे. प्रशासनाला दोष देण्यापेक्षा अकोलेकरांनाही पाण्याच्या नासाडीची काळजी नसावी, याबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. 

दक्षिण झोनसह पूर्व झोनमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचते किंवा नाही, यासाठी ‘टेस्टिंग’ घेतली जात आहे. त्यामध्ये बहुतांश वेळा टॅँकरद्वारे पाण्याचा उपयोग केला जातो. तरीही उन्हाळ्य़ाचे दिवस लक्षात घेता पाण्याच्या नासाडीला आवर घालण्याची दक्षता घेतली जाईल. -सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग मनपा- 

टॅग्स :WaterपाणीAkolaअकोला