शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘सुपर स्पेशालिटी’ पदांच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 10:29 IST

आवश्यक पद निर्मितीच्या बाबतीत मात्र शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

अकोला : राज्यात अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. चारही ठिकाणच्या हॉस्पिटलच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून, अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात आहेत; पण चारही रुग्णालयांच्या आवश्यक पदांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. मध्यंतरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद््घाटनाची घाई करण्यात आली होती; मात्र त्यासाठी आवश्यक पद निर्मितीच्या बाबतीत मात्र शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. चारही इमारतींचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. चारही हॉस्पिटलच्या पद मंजुरीचा आराखडा संचालकांकडे पाठविण्यात आला, तरी त्यांना अद्याही मंजुरी मिळाली नाही. मध्यंतरी केंद्र शासनाच्या पत्रानुसार, अकोल्यासह औरंगाबाद व लातूर येथील सुपर स्पेशालिटीचे डिसेंबरमध्येच, तर यवतमाळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद््घाटन मार्च-२०२० मध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आली होती; मात्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालविण्यासाठी मनुष्यबळ निर्मितीकडे शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जीएमसीच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे प्राप्त झालेले आहेत. शासनाकडे आवश्यक पदांसाठी पाठपुरावा सुरू आहे.

वीज पुरवठाही मिळेना!सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी एमआरआय, सीटी स्कॅनसह इतर अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे येऊन दोन वर्षांचा कालावधी झाला; पण अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला अद्यापही वीज पुरवठा मिळालेला नाही. त्यामुळे महागड्या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन रखडले आहे. अशीच काहीशी स्थिती राज्यातील इतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची आहे.

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटल