शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

अकोला : बियाणे कंपन्यांना लवकरच फौजदारी दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 2:10 AM

अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तपासणी पथकाने अहवाल दाखल केला असून, या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकार्‍यांचे बयान नोंदवून या कंपन्यांना फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबोंडअळीचा प्रादुर्भावतपासणी पथकाच्या अहवालावरून होणार गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तपासणी पथकाने अहवाल दाखल केला असून, या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकार्‍यांचे बयान नोंदवून या कंपन्यांना फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे कापसाचे तब्बल ९0 टक्के नुकसान झाल्याने शेकडो शेतकर्‍यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या तालुका बीज निरीक्षक समितीने पाहणी करू न जिल्हा तक्रार निवारण समितीकडे अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार तक्रार निवारण समितीने जिल्हय़ातील बीटी कापूस क्षेत्राची पाहणी व तपासणी केली. त्यामध्ये बोंडअळीने कापसाचे नुकसान झाल्याचे समोर आल्याचा अहवाल एमआयडीसी पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला आहे. बीटी बियाणे उत्पादक सहा कंपन्यांविरुद्ध हा अहवाल असून, यामध्ये शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.  तपासणी पथकाच्या या अहवालावरून एमआयडीसी पोलिसांनी बयान नोंदविण्याचे काम हाती घेतले असून, लवकरच या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या कंपन्याविरुद्ध होणार गुन्हा दाखल!कावेरी सीड्स सिकंदराबाद, आदित्य सीड्स सिकंदराबाद, राशी सीड्स मेडक तेलंगणा, रॅलीज सीड्स मुंबई, अजित सीड्स प्रा. लि. औरंगाबाद, वायरक्रॉप सायन्स ठाणे या सहा कंपन्यांनी हजारो शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा अहवाल कृषी विभागाने रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेला आहे. 

सहा शेतकरी फसले!प्राथमिक चौकशीत सहा शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे; मात्र केवळ तक्रारींसाठी सहा शेतकरी समोर आले असून, फसवणूक हजारो शेतकर्‍यांची झाली आहे. या हजारो शेतकर्‍यांचीही फसवणूक झाल्याचे निश्‍चित असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास यामध्ये हजारो शेतकरी तक्रारीसाठी पुढे येणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

कृषी विभाग तसेच संबंधित विभागाच्या तपासणी पथकाचा अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला . या अहवालामध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांनी सहा शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.  मात्र तरीही या अधिकार्‍यांचे बयान नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. - किशोर शेळके,ठाणेदार, एमआयडीसी पोलीस ठाणे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरcottonकापूस