शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : बियाणे कंपन्यांना लवकरच फौजदारी दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:12 IST

अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तपासणी पथकाने अहवाल दाखल केला असून, या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकार्‍यांचे बयान नोंदवून या कंपन्यांना फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबोंडअळीचा प्रादुर्भावतपासणी पथकाच्या अहवालावरून होणार गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तपासणी पथकाने अहवाल दाखल केला असून, या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकार्‍यांचे बयान नोंदवून या कंपन्यांना फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे कापसाचे तब्बल ९0 टक्के नुकसान झाल्याने शेकडो शेतकर्‍यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या तालुका बीज निरीक्षक समितीने पाहणी करू न जिल्हा तक्रार निवारण समितीकडे अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार तक्रार निवारण समितीने जिल्हय़ातील बीटी कापूस क्षेत्राची पाहणी व तपासणी केली. त्यामध्ये बोंडअळीने कापसाचे नुकसान झाल्याचे समोर आल्याचा अहवाल एमआयडीसी पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला आहे. बीटी बियाणे उत्पादक सहा कंपन्यांविरुद्ध हा अहवाल असून, यामध्ये शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.  तपासणी पथकाच्या या अहवालावरून एमआयडीसी पोलिसांनी बयान नोंदविण्याचे काम हाती घेतले असून, लवकरच या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या कंपन्याविरुद्ध होणार गुन्हा दाखल!कावेरी सीड्स सिकंदराबाद, आदित्य सीड्स सिकंदराबाद, राशी सीड्स मेडक तेलंगणा, रॅलीज सीड्स मुंबई, अजित सीड्स प्रा. लि. औरंगाबाद, वायरक्रॉप सायन्स ठाणे या सहा कंपन्यांनी हजारो शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा अहवाल कृषी विभागाने रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेला आहे. 

सहा शेतकरी फसले!प्राथमिक चौकशीत सहा शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे; मात्र केवळ तक्रारींसाठी सहा शेतकरी समोर आले असून, फसवणूक हजारो शेतकर्‍यांची झाली आहे. या हजारो शेतकर्‍यांचीही फसवणूक झाल्याचे निश्‍चित असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास यामध्ये हजारो शेतकरी तक्रारीसाठी पुढे येणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

कृषी विभाग तसेच संबंधित विभागाच्या तपासणी पथकाचा अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला . या अहवालामध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांनी सहा शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.  मात्र तरीही या अधिकार्‍यांचे बयान नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. - किशोर शेळके,ठाणेदार, एमआयडीसी पोलीस ठाणे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरcottonकापूस