शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

अकोल्यात रेस्टॉरंट्स बनले लव्हर्स पॉइंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:02 IST

शहरातील रेस्टॉरंट्स आणि गल्लीबोळामध्ये ही अल्पवयीन मुले, मुली रोज संध्याकाळी प्रेमलीलांमध्ये मग्न असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देरणपिसे नगर, राऊतवाडी, जठारपेठ, शासकीय दूध डेअरीमागील परिसर, गोरक्षण रोड भागात ही दृश्ये दिसतात. मुले, मुली अनेकदा घोळक्याने असतात, त्यामुळे कुणाला शंका येत नाही.स्कार्फ बांधून बॉयफे्रंडसोबत कुठेही फिरली तरी कोणी ओळखत नाही.

- सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो, इस दुनियासे नही डरेंगे हम दोनो...हे गाणे एकेकाळी फार गाजले होते. असेच काहीसे चित्र शहराच्या गल्लीबोळात, रेस्टॉरंट्स आणि आइस्क्रीम पार्लरमध्ये सर्रास पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे, आपल्या मुलांच्या या गुणांविषयी पालकांना काहीच माहीत नसले तरी त्यांच्यावर असलेला आंधळा विश्वास आई-वडिलांचाच विश्वासघात करणारा असल्याचे पोलीस ठाण्यांमध्ये घडत असलेल्या घटनांवरून दिसून येते. मुली पळून गेल्यानंतर ५७ पैकी ४६ मुलींना परत आणण्यात पोलिसांना यश आले; मात्र याच मुलींनी नंतर ज्यांच्यासोबत गेल्या त्यांच्यासोबतच लग्न केल्याचेही समोर आले आहे.मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या आधुनिक राहणीमानाचे लोण अकोल्यातही धडकले आहे. मुले दहावीत जात नाहीत, तोच त्यांना महागड्या गाड्या, मोबाइल पालकांकडून पुरविले जातात. याचा उपयोग मुले कसा करीत आहेत, यावर मात्र पालकांचे अजिबात नियंत्रण नसल्याचे वास्तव सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. कॉलेज आणि कोचिंग क्लासेसमध्ये ही मुले काय दिवे लावतात, याची माहिती जेव्हा पालकांना होते, तेव्हा फार उशीर झालेला असतो. शहरातील रेस्टॉरंट्स आणि गल्लीबोळामध्ये ही अल्पवयीन मुले, मुली रोज संध्याकाळी प्रेमलीलांमध्ये मग्न असल्याचे दिसून येते. रणपिसे नगर, राऊतवाडी, जठारपेठ, शासकीय दूध डेअरीमागील परिसर, गोरक्षण रोड अशा अनेक भागात सहज फेरफटका मारला तरी ही दृश्ये दिसतात. ही मुले, मुली अनेकदा घोळक्याने असतात, त्यामुळे कुणाला शंका येत नाही; परंतु वस्तुस्थिती निराळीच असते. लहान वयात चुकीच्या दिशेने पडणारी आपल्या मुलांची पावले पालक ओळखू शकत नसल्याची खंत पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. मुलांवर आंधळा विश्वास आणि अति प्रेमापोटी त्यांना जास्तीचे स्वातंत्र्य देण्यात येत असल्याचे आई-वडिलांनाच गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याचे वास्तव आहे.

स्कार्फ नव्हे सुरक्षा कवचचेहरा स्कार्फने झाकून घेण्याची मुलींची सवय एक प्रकारे त्यांच्यासाठी सुरक्षा कवच ठरू लागली आहे. स्कार्फ बांधून बॉयफे्रंडसोबत कुठेही फिरली तरी कोणी ओळखत नाही, याची त्यांना खात्री असते. हा स्कार्फच आता मुलींचे संरक्षण करीत असल्याचे दिसून येत आहे.

५७ पैकी ४६ महिला मुलींना आणण्यात यशजिल्ह्यातील एकूण ५७ महिला व मुली बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६ महिला होत्या. यामधील ३९ महिलांना आणण्यात पोलिसांना यश आले तर ७ महिला परतच आल्या नाहीत, तर ११ अल्पवयीन मुली असून, यामधील ७ मुलींना परत आणण्यात पोलिसांची मोठी कामगिरी असल्याची माहिती आहे. यामधील ४ मुलींनी परत येण्यास नकार दिला. यानुसार जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या तसेच पळून गेलेल्या ५७ पैकी ४६ महिला व मुलींना आणण्यात पोलिसांना यश आले असून, ११ महिला व मुलींनी येण्यास नकार दिला.तसेच त्यांचा पत्ता लागला नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीcollegeमहाविद्यालय