शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

अकोल्यात रेस्टॉरंट्स बनले लव्हर्स पॉइंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:02 IST

शहरातील रेस्टॉरंट्स आणि गल्लीबोळामध्ये ही अल्पवयीन मुले, मुली रोज संध्याकाळी प्रेमलीलांमध्ये मग्न असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देरणपिसे नगर, राऊतवाडी, जठारपेठ, शासकीय दूध डेअरीमागील परिसर, गोरक्षण रोड भागात ही दृश्ये दिसतात. मुले, मुली अनेकदा घोळक्याने असतात, त्यामुळे कुणाला शंका येत नाही.स्कार्फ बांधून बॉयफे्रंडसोबत कुठेही फिरली तरी कोणी ओळखत नाही.

- सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो, इस दुनियासे नही डरेंगे हम दोनो...हे गाणे एकेकाळी फार गाजले होते. असेच काहीसे चित्र शहराच्या गल्लीबोळात, रेस्टॉरंट्स आणि आइस्क्रीम पार्लरमध्ये सर्रास पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे, आपल्या मुलांच्या या गुणांविषयी पालकांना काहीच माहीत नसले तरी त्यांच्यावर असलेला आंधळा विश्वास आई-वडिलांचाच विश्वासघात करणारा असल्याचे पोलीस ठाण्यांमध्ये घडत असलेल्या घटनांवरून दिसून येते. मुली पळून गेल्यानंतर ५७ पैकी ४६ मुलींना परत आणण्यात पोलिसांना यश आले; मात्र याच मुलींनी नंतर ज्यांच्यासोबत गेल्या त्यांच्यासोबतच लग्न केल्याचेही समोर आले आहे.मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या आधुनिक राहणीमानाचे लोण अकोल्यातही धडकले आहे. मुले दहावीत जात नाहीत, तोच त्यांना महागड्या गाड्या, मोबाइल पालकांकडून पुरविले जातात. याचा उपयोग मुले कसा करीत आहेत, यावर मात्र पालकांचे अजिबात नियंत्रण नसल्याचे वास्तव सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. कॉलेज आणि कोचिंग क्लासेसमध्ये ही मुले काय दिवे लावतात, याची माहिती जेव्हा पालकांना होते, तेव्हा फार उशीर झालेला असतो. शहरातील रेस्टॉरंट्स आणि गल्लीबोळामध्ये ही अल्पवयीन मुले, मुली रोज संध्याकाळी प्रेमलीलांमध्ये मग्न असल्याचे दिसून येते. रणपिसे नगर, राऊतवाडी, जठारपेठ, शासकीय दूध डेअरीमागील परिसर, गोरक्षण रोड अशा अनेक भागात सहज फेरफटका मारला तरी ही दृश्ये दिसतात. ही मुले, मुली अनेकदा घोळक्याने असतात, त्यामुळे कुणाला शंका येत नाही; परंतु वस्तुस्थिती निराळीच असते. लहान वयात चुकीच्या दिशेने पडणारी आपल्या मुलांची पावले पालक ओळखू शकत नसल्याची खंत पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. मुलांवर आंधळा विश्वास आणि अति प्रेमापोटी त्यांना जास्तीचे स्वातंत्र्य देण्यात येत असल्याचे आई-वडिलांनाच गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याचे वास्तव आहे.

स्कार्फ नव्हे सुरक्षा कवचचेहरा स्कार्फने झाकून घेण्याची मुलींची सवय एक प्रकारे त्यांच्यासाठी सुरक्षा कवच ठरू लागली आहे. स्कार्फ बांधून बॉयफे्रंडसोबत कुठेही फिरली तरी कोणी ओळखत नाही, याची त्यांना खात्री असते. हा स्कार्फच आता मुलींचे संरक्षण करीत असल्याचे दिसून येत आहे.

५७ पैकी ४६ महिला मुलींना आणण्यात यशजिल्ह्यातील एकूण ५७ महिला व मुली बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६ महिला होत्या. यामधील ३९ महिलांना आणण्यात पोलिसांना यश आले तर ७ महिला परतच आल्या नाहीत, तर ११ अल्पवयीन मुली असून, यामधील ७ मुलींना परत आणण्यात पोलिसांची मोठी कामगिरी असल्याची माहिती आहे. यामधील ४ मुलींनी परत येण्यास नकार दिला. यानुसार जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या तसेच पळून गेलेल्या ५७ पैकी ४६ महिला व मुलींना आणण्यात पोलिसांना यश आले असून, ११ महिला व मुलींनी येण्यास नकार दिला.तसेच त्यांचा पत्ता लागला नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीcollegeमहाविद्यालय