शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोला रेल्वेस्थानकावरील एक आरक्षण तिकीट खिडकी होणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 13:53 IST

अकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील चार आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक तिकीट खिडकी १ जून १८ पासून बंद केल्या जाणार असल्याचा निर्णय भुसावळ रेल्वे मंडळाने घेतला आहे.

ठळक मुद्दे रेल्वे आरक्षणासाठी नागरिक रेल्वे स्थानकावर कमी आणि डिजिटल प्रणालीचा जास्त वापर करीत असल्याची आकडेवारी समोर आली. त्या दिशेचे हे पहिले पाऊल असून, रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडक्या बंद केल्या जात आहेत. मात्र अकोला स्थानकावर केवळ १०० ची मागणी अधोरेखित झाली आहे, त्यामुळे एक खिडकी बंद होत आहे.

अकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील चार आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक तिकीट खिडकी १ जून १८ पासून बंद केल्या जाणार असल्याचा निर्णय भुसावळ रेल्वे मंडळाने घेतला आहे. अकोलासह नाशिक, मनमाड, अमरावती आणि खंडवा येथील तिकीट खिडक्यांची संख्याही कमी केली जात आहे. १ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.आपल्या रेल्वे प्रवासाला अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रवासी आरक्षण करून दूरचा प्रवास करतात. अलिकडे रेल्वे आरक्षणासाठी नागरिक रेल्वे स्थानकावर कमी आणि डिजिटल प्रणालीचा जास्त वापर करीत असल्याची आकडेवारी समोर आली. त्यामुळे रेल्वे विभागाने पेपरलेसच्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. त्या दिशेचे हे पहिले पाऊल असून, रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडक्या बंद केल्या जात आहेत. यामुळे मनुष्यबळ आणि पेपरचा वापर कमी होणार आहे. अकोला रेल्वेस्थानकावर पूर्वी चार आरक्षण खिडक्या होत्या. त्यांचा अलिकडचा प्रतिसाद कमी झाल्याने तीन खिडक्या सेवारत ठेवून एक खिडकी बंद करण्यात येत आहे. दररोज प्रत्येक आरक्षण खिडकीवर १५० तिकिटांची मागणी असली पाहिजे, असा नियम आहे; मात्र अकोला स्थानकावर केवळ १०० ची मागणी अधोरेखित झाली आहे, त्यामुळे एक खिडकी बंद होत आहे.मध्यरेल्वेच्या अनेक रेल्वेस्थानकावरील प्रत्यक्ष आरक्षण प्रणालीतील गर्दी कमी झाली आहे. इंटरनेट आणि आईआरसीटीसी, मोबाइल रेल्वे अ‍ॅपद्वारे कामकाज होत आहे. त्यामुळे आरक्षण खिडक्यांवरील गर्दी ओसरली आहे. डिजिटाईजेशनचा हा परिणाम आहे.- सुनील मिश्रा, सीनियर डीसीएम, रेल्वे मंडळ, भुसावळ.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक