शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

अकोला :  ही हलगर्जी कोरोनाचा प्रकोप वाढवणारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:29 IST

प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लोकांची बेफिकीर वृत्ती, यंत्रणेची हलगर्जी यामुळे अकोल्यात कोरोनाचा प्रकोप वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देवाढती रुग्णसंख्या, मृत्यूचा दर यामध्ये अकोला आघाडीवर आहे. दुकानांवरची गर्दी ओसंडून वाहताना दिसते.आता भाजी बाजार बंद केले; मात्र किराणांवरील गर्दी कमी होत नाही.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आले, संचारबंदी लावण्यात आली. अकोल्यात मात्र २२ मार्चचा जनता कर्फ्यू व त्यानंतरचे दोन दिवस बऱ्यापैकी शिस्त होती; नंतर मात्र डबलसीट, ट्रिपलसीटपासून रस्त्यावरच्या गर्दीचे चित्र कमी-अधिक फरकात कायमच राहिले. त्यात आता मूर्तिजापूरच्या घटनेनंतर प्रशासकीय हलगर्जीची भर पडली आहे. प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लोकांची बेफिकीर वृत्ती, यंत्रणेची हलगर्जी यामुळे अकोल्यात कोरोनाचा आणखी प्रकोप वाढवणारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.अमरावती, नागपूर, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत अकोल्याची लोकसंख्या व प्रगती एकदमच कमी आहे; मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत आपण टक्केवारीमध्ये या शहरांनाही मागे टाकले आहे. वाढती रुग्णसंख्या, मृत्यूचा दर यामध्ये अकोला आघाडीवर आहे. सद्यस्थितीत अकोल्यात ४४ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत; परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कमीच आहे.एकीकडे आरोग्य यंत्रणेतील योद्धा कोरोनाशी दोन हात करत जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहेत, तर दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर अक्षम्य अशी हलगर्जी दिसत आहे.हातगाडीवर मृतदेह नेण्याचा प्रकार असो की मूर्तिजापूरमध्ये अंत्यसंस्काराची घटना असो, प्रशासन डोळे झाकून काम करते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. उल्हासनगर येथे मूर्तिजापूरसारखाच प्रकार घडला, कोरोनाचा चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व विधी पाळण्यात आल्या. केवळ २० लोकांना परवानगी असताना त्यापेक्षा अधिक लोक होते. अंत्यसंस्कार झाले त्या मृतकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांची तपासणी झाली असता तब्बल १० लोकांना बाधा झाल्याचे समोर आले. आता या प्रकरणात याप्रकरणी नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. हे उदाहरण ताजे असतानाच मूर्तिजापुरात चूक घडली त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, तरच भविष्यात दक्षता घेतल्या जाईल, कारण कोरोनाचे संकट मोठे आहे.

...तर नोडल आॅफिसरची मागणी होईलअकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. दुसरीकडे यंत्रणांची हलगर्जी समोर येत आहे. पालकमंत्र्यांनी दोन दिवसांचा वर्ग घेतला. नेहमीच्या स्टाइलमध्ये हंगामा करण्यासाठी स्टिंगचा प्रयोगही केला. नंतर ‘जैसे थे’. सर्वोपचारमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड, साधनांचा अभाव अशा अनेक गोष्टी या सोशल मीडियातून बाहेर येत आहेत. या सर्व बाबींमधून रुग्णांचा सर्वोपचारवर विश्वास डळमळीत होत गेला तर यंत्रणांनी आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल अन् सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सोलापूरच्या धर्तीवर नोडल आॅफिसरची मागणी होईल. त्यामुळे आतापर्यंत परिश्रम घेतले आहेत. त्यामध्ये फक्त पारदर्शकता अन् सातत्य हवे तरच रुग्णांना सर्वोपचारचा अन् प्रशासकीय यंत्रणेचा आधार वाटेल.

किराणा नेता की कोरोना?लॉकडाउमध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना सवलत दिली आहे; मात्र ही सवलत जणू बाहेर पडण्याची संधीच आहे असे समजून प्रत्येक दुकानांवरची गर्दी ओसंडून वाहताना दिसते. तेच चित्र भाजी बाजाराचेही होते. आता भाजी बाजार बंद केले; मात्र किराणांवरील गर्दी कमी होत नाही. दुकानांमध्ये जाणाºया बहुतेकांकडे मास्कही नसतात. फिजिकल डिस्टन्सिंग तर दूरच राहिले. अशा स्थितीत आपण किराणा नेतो की कोरोना, याचाही विचार नागरिकांनी केला पाहिजे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला