शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकोला महापालिकेत विरोधी पक्षाची हवा गूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:06 IST

शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती  असताना मनपातील विरोधी पक्षांनी साधलेली चुप्पी खटकणारी ठरत आहे.  सत्ताधार्‍यांसमोर विरोधी पक्षाची हवा गूल झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे

ठळक मुद्देमूलभूत सुविधांचा बोजवाराविरोधकांनी साधली चुप्पी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवून  शहरासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्याची जबाबदारी विरोधी पक्षाने  निभावणे अपेक्षित आहे. महापालिकेचे आयुक्त, उपायुक्तपद मागील अनेक दिवसां पासून रिक्त आहे. तसेच शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती  असताना मनपातील विरोधी पक्षांनी साधलेली चुप्पी खटकणारी ठरत आहे.  सत्ताधार्‍यांसमोर विरोधी पक्षाची हवा गूल झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. महापालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग निष्क्रिय असल्यामुळे शहरात सर्वत्र  घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मनपाचे सफाई कर्मचारी मुख्य रस्त्यांसह प्रभागातील  अंतर्गत रस्त्यांची झाडपूस करत नसल्याने रस्त्यांवर धुळीचे ढीग साचले आहेत.  धुळीमुळे अकोलेकरांना श्‍वसनाचे आजार जडत असून, नागरिक हैराण झाले  आहेत. प्रभागातील नाल्या, गटारांची नियमित साफसफाई होत नसून, सांड पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची  दाणादाण उडाल्याची परिस्थिती आहे. धरणात जलसाठा कमी असल्याने  नागरिकांना आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेचे तत्कालीन  आयुक्त अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर आजपर्यंतही नवीन अधिकार्‍यांची  नियुक्ती झाली नाही. मनपाचे दोन्ही उपायुक्त पद रिक्त आहेत. महापालिकेचे एकूणच  चित्र पाहता विविध समस्यांनी नागरिक त्रस्त असताना सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षांनी  साधलेल्या चुपीमुळे अकोलेकरांमध्ये रोष निर्माण झाला आहे. प्रशासकीय  अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याचा स्थानिक कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे  दिसून येते. प्रशासनाचा ढेपाळलेला कारभार व सत्ताधार्‍यांच्या भूमिकेवर विरोधी पक्ष  काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह भारिप-बहुजन महासंघाने हल्लाबोल करणे  अपेक्षित असताना विरोधकांनी तलवार म्यान केल्याचे दिसत आहे. सत्ताधार्‍यांसमोर  विरोधी पक्ष हतबल ठरत असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

शासनाकडे दाद कधी मागणार?महापालिकेसह राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता असूनही महिनाभरापासून मनपाचे  आयुक्त पद रिक्त कसे, असा सवाल विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी उपस्थित  केला होता. सत्ताधार्‍यांनी आयुक्तपदी नवीन अधिकार्‍यांची नियुक्ती न केल्यास  काँग्रेसच्यावतीने आम्ही शासनाकडे दाद मागणार असल्याचे साजिद खान यांनी  प्रसिद्धी पत्रकात नमूद केले होते. मनपाचा ढेपाळलेला कारभार पाहता विरोधी पक्षने ता शासनाकडे कधी दाद मागणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. 

मुख्य रस्त्यांची झाडलोट नाहीच!प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांची दररोज झाडलोट करणे महा पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना क्रमप्राप्त आहे. अंतर्गत रस्त्यांची कधीही झाडलोट  होत नाही. मुख्य रस्त्यांची पंधरा दिवसातून एखाद्या वेळी थातूरमातूरपणे झाडलोट  केल्यानंतर माती उचलून न नेता दुभाजकालगत साचवून ठेवतात. वाहनांमुळे हीच  माती पुन्हा रस्त्यावर येते. यासह विविध समस्या असताना यापैकी एकाही समस्येवर  तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही.-

टॅग्स :Akola cityअकोला शहर