शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

अकोला महापालिकेची ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ मोहिमेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:53 IST

मोहिमेकडे मनपा प्रशासनाने सपशेल पाठ फिरविली असून, मागील दहा दिवसांत कचरा विलगीकरणाचा प्रयोग कागदावर असल्याचे चित्र समोर आले आहे.

ठळक मुद्दे राज्यात १ आॅगस्टपासून ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.मागील दहा दिवसांपासून या मोहिमेकडे मनपा प्रशासनाने पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले आहे.

अकोला: केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’च्या धर्तीवर राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ नागरी अभियान सुरू केले असून, कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विलगीकरण करून प्रक्रिया करण्यासाठी १ आॅगस्टपासून ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ मोहीम राबविण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. या मोहिमेकडे मनपा प्रशासनाने सपशेल पाठ फिरविली असून, मागील दहा दिवसांत कचरा विलगीकरणाचा प्रयोग कागदावर असल्याचे चित्र समोर आले आहे.स्वच्छ भारत अभियानच्या पहिल्या टप्प्यात शहराला हगणदरीमुक्त करण्याचे महापालिकेला उद्दिष्ट होते. २०१७ मध्ये राज्यातील सर्व शहरे हगणदरीमुक्त झाल्याचे शासनाने घोषित केल्यानंतर दुसºया टप्प्यात कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी मे २०१७ पासून ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम राबविण्याचे शासनाने निर्देश दिले होते. कचºयाच्या विलगीकरणासाठी महापालिकेला ३० जूनपर्यंत मुदत होती. विलगीकरण न केल्यास मनपाचे अनुदान बंद करण्याचा इशारा शासनाने दिला होता. असे असले तरी मनपा प्रशासनाने ‘कचरा लाख मोलाचा’ मोहिमेला ‘खो’ दिल्याचे समोर आले. कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी राज्यात १ आॅगस्टपासून ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही मोहीम ३१ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार असली, तरी मागील दहा दिवसांपासून या मोहिमेकडे मनपा प्रशासनाने पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले आहे.काय आहे ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ मोहीम?मनपाच्या स्तरावर राबविल्या जाणाºया ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ मोहिमेंतर्गत ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या कामाला गती देणे अपेक्षित आहे. मनपाने दररोज केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन अधिकाºयांकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यावर जिल्हा प्रशासन अधिकाºयांनी प्राप्त अहवालानुसार प्रत्यक्षात कचरा विलगीकरणाचे काम सुरू आहे किंवा नाही, याची आठवड्यातून एक दिवस मनपा प्रशासनाला भेट देऊन खात्री करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालय व राज्य अभियान संचालनालयाकडे पाठवावा लागेल.मोहीम कधी राबविणार?शासनाने स्वच्छ आॅगस्ट क्रांती महिना घोषित करून दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी प्रशासनाने या मोहिमेसाठी काय धोरण निश्चित केले, याबाबत स्वच्छता व आरोग्य विभागात एकवाक्यता नाही. प्रशासनाने ही मोहीम न राबविल्यास संबंधित शहरांची तपासणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका