शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

​​​​​​​अकोला मनपाच्या दप्तरी आता १ लाख ५३ हजार मालमत्तांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 2:04 PM

‘स्थापत्य’कंपनीच्यावतीने मालमत्तांचे सर्वेक्षण व मोजमापाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, मनपाच्या दप्तरी आता १ लाख ५३ हजार मालमत्तांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे१८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मनपा प्रशासनाने मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘जीआयएस’प्रणाली’द्वारे पुनर्मूल्यांकनाला मंजुरी दिली. नवीन प्रभागात ४९ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली आहे.

- आशिष गावंडे

अकोला : महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करवाढीसाठी प्रशासनाने ‘जीआयएस’प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले. ‘स्थापत्य’कंपनीच्यावतीने मालमत्तांचे सर्वेक्षण व मोजमापाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, मनपाच्या दप्तरी आता १ लाख ५३ हजार मालमत्तांची नोंद झाली आहे. यापूर्वी कर वसुली विभागाकडे ७१ हजार मालमत्तांची नोंद होती. त्यापैकी ३१ हजार मालमत्ताधारकांनी मनपाकडे कधीही कर जमा केला नसल्याचे धक्कादायक वास्तव सर्वेक्षणादरम्यान उजेडात आले, हे येथे उल्लेखनीय.

मनपा प्रशासनाने दर तीन वर्षांनंतर शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून त्यावर सुधारित दर आकारणी करणे अपेक्षित आहे. याठिकाणी स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या महापालिकेच्या अधिकाºयांनी व मतांची गोळाबेरीज करणाºया राजकीय पदाधिकाºयांनी जाणीवपूर्वक मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. साहजिकच त्याचा परिणाम मनपाच्या उत्पन्नावर झाला. तब्बल १८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मनपा प्रशासनाने मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘जीआयएस’प्रणाली’द्वारे पुनर्मूल्यांकनाला मंजुरी दिली. ‘स्थापत्य’नामक कंपनीने मनपा क्षेत्रातील नवीन प्रभाग वगळून इतर भागात पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली असता १ लाख ४ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान एक-दोन नव्हे तर चक्क ३१ हजार मालमत्ताधारकांनी मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाकडे कधीही कर जमा केलाच नसल्याचे चित्र समोर आले. हद्दवाढीनंतर मनपा क्षेत्रात सामील झालेल्या नवीन प्रभागांतील मालमत्तांचे सर्वेक्षण व मोजमापाची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. नवीन प्रभागात ४९ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली आहे. नियमानुसार संबंधित मालमत्ताधारकांचे आक्षेप व हरकती-सूचना निकाली काढण्यासाठी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.पुढील आठवड्यात सुनावणी?मनपा क्षेत्राची हद्दवाढ होऊन २४ गावांचा मनपात समावेश झाला. त्यावेळी मालमत्तांची अचूक संख्या किती, याबद्दल तत्कालीन ग्राम पंचायतींनी दिलेल्या आकडेवारीबद्दल संभ्रम होता. प्रशासनाने ‘जीआयएस’प्रणालीचा वापर करून पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली असता ५४ हजार मालमत्तांची नोंद झाली. नागरिकांचे आक्षेप, हरकती व सूचना निकाली काढण्यासाठी प्रशासनाकडून पुढील आठवड्यात सुनावणी प्रक्रियेला प्रारंभ होण्याची दाट शक्यता आहे.

राजकारणी, डॉक्टर, उद्योजकांनी लावला चुना!मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया राबवताना अचंबित करणारे अनेक प्रकार समोर आल्याची माहिती आहे. शहरातील राजकारणी, नामवंत डॉक्टर, उद्योजकांनी उभारलेले आलिशान बंगले, प्रतिष्ठाण, हॉस्पिटल यांच्या बदल्यात मनपाकडे अत्यंत नगण्य कर जमा केल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे मनपाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुधारित कर लागू झाल्यामुळे संबंधितांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.टप्प्याटप्प्याने होईल करवाढ!महापालिका प्रशासनाने लागू केलेली सुधारित दरवाढ नवीन प्रभागातील मालमत्ताधारकांना लागू होणार नाही. हद्दवाढीच्या निकषानुसार संबंधित मालमत्ताधारकांना प्रती वर्ष २० टक्के नुसार मालमत्ता कराच्या रकमेत वाढ केली जाणार आहे. अर्थात, पाच वर्षांनंतर सुधारित दरानुसार पूर्ण कर लागू केला जाईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका