शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
2
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
3
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
4
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
5
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
6
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
7
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
8
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
9
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
10
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
11
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
12
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
13
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
14
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
15
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
16
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
17
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
18
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
19
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
20
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले

अकोला महापालिका हद्दवाढीला लागणार ‘कात्री’!

By admin | Updated: April 4, 2016 02:22 IST

मनपा क्षेत्रालगत असलेल्या वस्त्यांचाच समावेश मनपा क्षेत्रात करण्यात यावा; गोपीकिशन बाजोरिया यांची लक्षवेधी.

अकोला: महानगरपालिकेचे क्षेत्र २५ चौरस किलोमीटरवरून १२४ चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यासाठी सादर करण्यात आलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत विधिमंडळात जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला आहे. हद्दवाढीसाठी अनावश्यक भूभागाचा समावेश प्रस्तावित करण्यात आल्याने, हद्दवाढीला 'कात्री' लागण्याची शक्यता आहे. अकोला महानगरपालिकेची हद्द वाढवून लगतच्या २४ गावांचा समावेश मनपा क्षेत्रात करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतची अधिसूचना काढण्यात आली असून, १७ एप्रिलपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत; मात्र त्यापूर्वीच मनपाची ह्यहद्दवाढह्ण विधिमंडळात पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये याबाबत लक्षवेधी उपस्थित केली असून, ती मंगळवारी पटलावर येणार आहे. यात त्यांनी मनपाची हद्द २५ चौरस किलोमीटरहून १२४ चौरस किलोमीटरपर्यंत वाढविली जात असल्याबाबत आक्षेप नोंदवून अनावश्यक भूभाग जोडण्यात येत असल्याने, यातून उपस्थित होणार्‍या अनेक प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. वाढते नागरीकरण आणि मनपा हद्दीतील विकासाचा वेग बघता २५ किलोमीटरमध्ये जो विकास साधता आला नाही, तो पुढे १२४ चौरस किलोमीटरच्या हद्दीत कसा साधता येईल, असा प्रश्न उपस्थित केला असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना दिली. त्यामुळे मनपा क्षेत्रालगत असलेल्या वस्त्यांचाच समावेश मनपा क्षेत्रात करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.'ना इधर के, ना उधर के'!सध्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून वित्त, आरोग्यासह विविध विकास निधी मिळतो. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेला हा निधी कोट्यवधींच्या घरात आहे. मनपा क्षेत्रात समाविष्ट झाल्यानंतर या ग्रामपंचायतींना मिळणारा निधी बंद होईल. याशिवाय या भागापर्यंत विकास पोहोचण्याकरिता किमान २0 वर्षे लागतील. त्यामुळे ग्रामपंचायतींचा हा भाग सर्वच विकासनिधीपासून वंचित राहणार आहे. भरिस भर या परिसरातील नागरिकांना महापालिका कराचा बोजाही सहन करावा लागेल.शेतीयोग्य जमिनीचा प्रश्नप्रस्तावित हद्दवाढीनंतर शहराच्या सीमांपासून दूर असलेल्या ग्रामपंचायतींचे क्षेत्र मनपा हद्दीत येणार आहे. त्यामुळे मनपा क्षेत्र आणि या गावांपर्यंत असलेल्या शेकडो एकर शेतजमिनींचा प्रश्न निर्माण होणार आहे. सिलोडा, चांदूर, खरप, भौरद आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणारी शेकडो एकर जमीन यामुळे नाहक अकृषक होणार आहे.