शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिका हद्दवाढीला लागणार ‘कात्री’!

By admin | Updated: April 4, 2016 02:22 IST

मनपा क्षेत्रालगत असलेल्या वस्त्यांचाच समावेश मनपा क्षेत्रात करण्यात यावा; गोपीकिशन बाजोरिया यांची लक्षवेधी.

अकोला: महानगरपालिकेचे क्षेत्र २५ चौरस किलोमीटरवरून १२४ चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यासाठी सादर करण्यात आलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत विधिमंडळात जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला आहे. हद्दवाढीसाठी अनावश्यक भूभागाचा समावेश प्रस्तावित करण्यात आल्याने, हद्दवाढीला 'कात्री' लागण्याची शक्यता आहे. अकोला महानगरपालिकेची हद्द वाढवून लगतच्या २४ गावांचा समावेश मनपा क्षेत्रात करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतची अधिसूचना काढण्यात आली असून, १७ एप्रिलपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत; मात्र त्यापूर्वीच मनपाची ह्यहद्दवाढह्ण विधिमंडळात पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये याबाबत लक्षवेधी उपस्थित केली असून, ती मंगळवारी पटलावर येणार आहे. यात त्यांनी मनपाची हद्द २५ चौरस किलोमीटरहून १२४ चौरस किलोमीटरपर्यंत वाढविली जात असल्याबाबत आक्षेप नोंदवून अनावश्यक भूभाग जोडण्यात येत असल्याने, यातून उपस्थित होणार्‍या अनेक प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. वाढते नागरीकरण आणि मनपा हद्दीतील विकासाचा वेग बघता २५ किलोमीटरमध्ये जो विकास साधता आला नाही, तो पुढे १२४ चौरस किलोमीटरच्या हद्दीत कसा साधता येईल, असा प्रश्न उपस्थित केला असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना दिली. त्यामुळे मनपा क्षेत्रालगत असलेल्या वस्त्यांचाच समावेश मनपा क्षेत्रात करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.'ना इधर के, ना उधर के'!सध्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून वित्त, आरोग्यासह विविध विकास निधी मिळतो. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेला हा निधी कोट्यवधींच्या घरात आहे. मनपा क्षेत्रात समाविष्ट झाल्यानंतर या ग्रामपंचायतींना मिळणारा निधी बंद होईल. याशिवाय या भागापर्यंत विकास पोहोचण्याकरिता किमान २0 वर्षे लागतील. त्यामुळे ग्रामपंचायतींचा हा भाग सर्वच विकासनिधीपासून वंचित राहणार आहे. भरिस भर या परिसरातील नागरिकांना महापालिका कराचा बोजाही सहन करावा लागेल.शेतीयोग्य जमिनीचा प्रश्नप्रस्तावित हद्दवाढीनंतर शहराच्या सीमांपासून दूर असलेल्या ग्रामपंचायतींचे क्षेत्र मनपा हद्दीत येणार आहे. त्यामुळे मनपा क्षेत्र आणि या गावांपर्यंत असलेल्या शेकडो एकर शेतजमिनींचा प्रश्न निर्माण होणार आहे. सिलोडा, चांदूर, खरप, भौरद आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणारी शेकडो एकर जमीन यामुळे नाहक अकृषक होणार आहे.