शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

अकोला एमआयडीसी जलपुनर्भरणापेक्षा कूपनलिका खोदण्यातच आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:21 IST

आपल्या परिसरात कोसळणाऱ्या पाण्याचे तरी जलपुनर्भरण करणे गरजेचे आहे. एमआयडीसी प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग अडचणीत सापडले असून, येथील पाणीटंचाई उग्ररूप घेत आहे. एमआयडीसीतील सहाशेपैकी किमान दोनशे उद्योजकांकडे कूपनलिका आहेत. सहाशे उद्योगांपैकी केवळ बोटांवर मोजण्याएवढ्या साठ उद्योगांनी जलपुनर्भरणाची यंत्रणा लावली आहे.

अकोला : पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग अडचणीत सापडले असून, येथील पाणीटंचाई उग्ररूप घेत आहे. पाणीटंचाईची ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत ठरत आहे.मागील वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने अकोलेकरांवर जलसंकट आले आहे. एकीकडे पिण्यासाठी, तर दुसरीकडे उद्योगांना संजीवनी देण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अकोल्यातील सहाशे उद्योगांना एमआयडीसी प्रशासनाकडून अत्यल्प पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पर्यायाने उद्योजकांना दररोज सातशे-पाचशे रुपयांप्रमाणे पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. पाणीटंचाईच्या काळात प्रत्येकाजवळ भूगर्भातील जलसाठा उपलब्ध व्हावा म्हणून किमान आपल्या परिसरात कोसळणाऱ्या पाण्याचे तरी जलपुनर्भरण करणे गरजेचे आहे. एमआयडीसी प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. एमआयडीसीतील सहाशे उद्योगांपैकी केवळ बोटांवर मोजण्याएवढ्या साठ उद्योगांनी जलपुनर्भरणाची यंत्रणा लावली आहे. इतरांनी मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून कूपनलिका खोदल्या आहेत. त्याला एमआयडीसी प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. वास्तविक पाहता, कूपनलिका खोदण्याआधी परवानगी आवश्यक आहे. मात्र, एमआयडीसीतील सहाशेपैकी किमान दोनशे उद्योजकांकडे कूपनलिका आहेत. यातील किती अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत, याचा शोध यंत्रणेने घ्यावा. जेव्हा भीषण पाणीटंचाई भेडसावते, तेव्हा उद्योजकांना प्रशासन आणि शासनाची आठवण होते. पण, स्वत: याला ते किती जबाबदार आहेत, याचा उद्योजक विचार करीत नाही. पाणी पुरवठा पाइपलाइन टाकणे आणि कुंभारी तलावाचे हस्तांतरण होणे, या बाबी उद्योजकांच्या हाती नसल्या, तरी जलपुनर्भरण मात्र त्यांच्या हाती आहे. यासाठी एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सर्वांना सक्तीचे निर्देश द्यावे. जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासनानेदेखील आपल्या नेहमीच्या चौकटी सोडून पुढाकार घेत, या कामाला गती द्यावी. तरच एमआयडीसीतील पाणीटंचाईचा सामना करणे शक्य होईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ