शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अकोला एमआयडीसीने घेतला २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:28 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अकोला कार्यालयाने पाणी टंंचाईच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी यंदा २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्दे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे धोरण ठरविण्यात आले.अकोल्याची पाणी पातळी सातत्याने खालावत असून, दर दोन-तीन वर्षात अकोलेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येतून कायमचे बाहेर पडण्यासाठी एमआयडीसीने वृक्ष लागवड करावी, असे आदेश वरिष्ठांकडून आहेत.

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अकोला कार्यालयाने पाणी टंंचाईच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी यंदा २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे धोरण ठरविण्यात आले.अकोल्याची पाणी पातळी सातत्याने खालावत असून, दर दोन-तीन वर्षात अकोलेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येतून कायमचे बाहेर पडण्यासाठी एमआयडीसीने वृक्ष लागवड करावी, असे आदेश वरिष्ठांकडून आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एमआयडीसी अधिकारी, अभियंता आणि उद्योजकांना पाचारण करण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड यांनी २७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट स्वीकारले. यावेळी एमआयडीसीतील अधिकारी-अभियंतादेखील प्रामुख्याने उपस्थित होते.ओपन स्पेस ताब्यात द्या, ६० हजार वृक्ष लागवडी करू...एमआयडीसीतील प्रदूषण दूर करण्यासाठी दहा टक्के प्लॉटचे आरक्षण करून त्यावर ग्रीनअरी करण्याचा नियम आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दहा टक्के ओपन स्पेस कुठे आहे. त्याचा वापर काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एमआयडीसी प्रशासनाने ओपन स्पेस ताब्यात द्यावे, ६० हजार वृक्षांची लागवड करून देतो, असे उद्योजकांनी आवाहन दिले आहे. आता एमआयडीसी प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ