शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अकोल्याने गमाविली हुंडीचिठ्ठीची पत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:16 IST

समाजमान्यतेतून हुंडीचिठ्ठीची परंपरा आजही सुरू आहे; मात्र व्यापाºयांची नीतिमत्ता पूर्वीप्रमाणे प्रामाणिक न राहिल्याने हुंडीचिठ्ठीच्या व्यवहारातील विश्वास पुरता गमाविला आहे.

ठळक मुद्देउद्योग-व्यापारात आर्थिक मदतीची गरज भासली, तर हुंडीचिठ्ठीच्या माध्यमातून त्यास मदत केली जात असे. मुंबई, पुणे, नागपूर आणि मोठमोठ्या शहरांमध्ये विदर्भातील हुंडीचिठ्ठीच्या प्रतिष्ठेच्या बाबींची चर्चा आजही होते. या क्षेत्रात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला असून, त्यांनी हुंडीचिठ्ठीच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह तयार केले आहे.

- संजय खांडेकर  अकोला : ब्रिटिशकालीन सीपी अ‍ॅण्ड बेरारमध्ये अकोला असताना राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका आणि पतसंस्थांची संख्या तेवढी नव्हती. व्यापार करणाऱ्यांना कर्ज पुरवठा करणाºया परंपरागत यंत्रणेत सावकार आणि हुंडीचिठ्ठी दोनच आधार होते. दोन्ही बाबींना कायदेशीर मान्यता नसली, तरी तत्कालीन समाजमान्यता होती. याच समाजमान्यतेतून हुंडीचिठ्ठीची परंपरा आजही सुरू आहे; मात्र व्यापाºयांची नीतिमत्ता पूर्वीप्रमाणे प्रामाणिक न राहिल्याने हुंडीचिठ्ठीच्या व्यवहारातील विश्वास पुरता गमाविला आहे.अकोला मध्य प्रदेशात असताना अनेक मोठे उद्योजक आणि उद्योग अकोल्यात असत. त्याकाळी कुणी आर्थिक संकटात सापडला किंवा त्याला उद्योग-व्यापारात आर्थिक मदतीची गरज भासली, तर हुंडीचिठ्ठीच्या माध्यमातून त्यास मदत केली जात असे. ही रक्कम २५ हजारांपासून तर कोटींच्या घरात असायची आणि आहे. ही यंत्रणा चालविण्यासाठी काही विश्वासू एजंट कार्यरत आहेत. अकोल्यातील मोठमोठ्या रकमा विदर्भ आणि त्याबाहेरही दिल्या जात होत्या आणि आजही दिल्या जात आहेत. दोन दिवसांत दोन कोटींची रक्कम देणारी जर कोणती यंत्रणा अस्तित्वात असेल, तर ती केवळ हुंडीचिठ्ठी आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि मोठमोठ्या शहरांमध्ये विदर्भातील हुंडीचिठ्ठीच्या प्रतिष्ठेच्या बाबींची चर्चा आजही होते. धनादेश आणि एका कागदावर हा पूर्ण व्यवहार होतो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली ही यंत्रणा आजही तशीच आहे, त्यानंतर अनेक राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका पुढे आल्या. अनेकांचे व्यवहार बँकांकडे गेले; मात्र हुंडीचिठ्ठीचा व्यवहार पूर्वीसारखाच अबाधित राहिला. पूर्वी बाजारपेठेतील व्यापाºयाची प्रतिष्ठा सर्वात महत्त्वाची असायची. आता मात्र प्रतिष्ठेपेक्षाही जास्त महत्त्वाचा पैसा मोठा झाला आहे. त्यामुळे हुंडीचिठ्ठीतील पत गेली आहे. या क्षेत्रात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला असून, त्यांनी हुंडीचिठ्ठीच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह तयार केले आहे. सुरुवातीच्या काळात आलू-कांदे व्यापाºयाने हात वर केले. त्यानंतर ४० कोटींनी एका मोटारसायकल एजन्सी चालविणाºयाने गंडा दिला. काही औषधे व्यावसायिकांनी रकमा थांबविल्यात. आता काही उद्योजक दिवाळा काढण्याच्या मनस्थितीत आहेत. अकोला जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या धनादेश अनादराच्या १३८ पैकी ८० टक्के खटले हे हुंडीचिठ्ठी व्यवहारातील आहेत. कधीकाळी दिवाळा काढलेल्या व्यापाºयालाही मदत केली जात असे; मात्र अलीकडे सर्वकाही व्यवस्थित असताना दिवाळे काढण्याची नवी प्रथा तयार होत आहे. याला दलालही मोठ्या प्रमाणात दोषी असल्याचे उघड होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय