शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकोल्याने गमाविली हुंडीचिठ्ठीची पत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:16 IST

समाजमान्यतेतून हुंडीचिठ्ठीची परंपरा आजही सुरू आहे; मात्र व्यापाºयांची नीतिमत्ता पूर्वीप्रमाणे प्रामाणिक न राहिल्याने हुंडीचिठ्ठीच्या व्यवहारातील विश्वास पुरता गमाविला आहे.

ठळक मुद्देउद्योग-व्यापारात आर्थिक मदतीची गरज भासली, तर हुंडीचिठ्ठीच्या माध्यमातून त्यास मदत केली जात असे. मुंबई, पुणे, नागपूर आणि मोठमोठ्या शहरांमध्ये विदर्भातील हुंडीचिठ्ठीच्या प्रतिष्ठेच्या बाबींची चर्चा आजही होते. या क्षेत्रात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला असून, त्यांनी हुंडीचिठ्ठीच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह तयार केले आहे.

- संजय खांडेकर  अकोला : ब्रिटिशकालीन सीपी अ‍ॅण्ड बेरारमध्ये अकोला असताना राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका आणि पतसंस्थांची संख्या तेवढी नव्हती. व्यापार करणाऱ्यांना कर्ज पुरवठा करणाºया परंपरागत यंत्रणेत सावकार आणि हुंडीचिठ्ठी दोनच आधार होते. दोन्ही बाबींना कायदेशीर मान्यता नसली, तरी तत्कालीन समाजमान्यता होती. याच समाजमान्यतेतून हुंडीचिठ्ठीची परंपरा आजही सुरू आहे; मात्र व्यापाºयांची नीतिमत्ता पूर्वीप्रमाणे प्रामाणिक न राहिल्याने हुंडीचिठ्ठीच्या व्यवहारातील विश्वास पुरता गमाविला आहे.अकोला मध्य प्रदेशात असताना अनेक मोठे उद्योजक आणि उद्योग अकोल्यात असत. त्याकाळी कुणी आर्थिक संकटात सापडला किंवा त्याला उद्योग-व्यापारात आर्थिक मदतीची गरज भासली, तर हुंडीचिठ्ठीच्या माध्यमातून त्यास मदत केली जात असे. ही रक्कम २५ हजारांपासून तर कोटींच्या घरात असायची आणि आहे. ही यंत्रणा चालविण्यासाठी काही विश्वासू एजंट कार्यरत आहेत. अकोल्यातील मोठमोठ्या रकमा विदर्भ आणि त्याबाहेरही दिल्या जात होत्या आणि आजही दिल्या जात आहेत. दोन दिवसांत दोन कोटींची रक्कम देणारी जर कोणती यंत्रणा अस्तित्वात असेल, तर ती केवळ हुंडीचिठ्ठी आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि मोठमोठ्या शहरांमध्ये विदर्भातील हुंडीचिठ्ठीच्या प्रतिष्ठेच्या बाबींची चर्चा आजही होते. धनादेश आणि एका कागदावर हा पूर्ण व्यवहार होतो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली ही यंत्रणा आजही तशीच आहे, त्यानंतर अनेक राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका पुढे आल्या. अनेकांचे व्यवहार बँकांकडे गेले; मात्र हुंडीचिठ्ठीचा व्यवहार पूर्वीसारखाच अबाधित राहिला. पूर्वी बाजारपेठेतील व्यापाºयाची प्रतिष्ठा सर्वात महत्त्वाची असायची. आता मात्र प्रतिष्ठेपेक्षाही जास्त महत्त्वाचा पैसा मोठा झाला आहे. त्यामुळे हुंडीचिठ्ठीतील पत गेली आहे. या क्षेत्रात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला असून, त्यांनी हुंडीचिठ्ठीच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह तयार केले आहे. सुरुवातीच्या काळात आलू-कांदे व्यापाºयाने हात वर केले. त्यानंतर ४० कोटींनी एका मोटारसायकल एजन्सी चालविणाºयाने गंडा दिला. काही औषधे व्यावसायिकांनी रकमा थांबविल्यात. आता काही उद्योजक दिवाळा काढण्याच्या मनस्थितीत आहेत. अकोला जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या धनादेश अनादराच्या १३८ पैकी ८० टक्के खटले हे हुंडीचिठ्ठी व्यवहारातील आहेत. कधीकाळी दिवाळा काढलेल्या व्यापाºयालाही मदत केली जात असे; मात्र अलीकडे सर्वकाही व्यवस्थित असताना दिवाळे काढण्याची नवी प्रथा तयार होत आहे. याला दलालही मोठ्या प्रमाणात दोषी असल्याचे उघड होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय