शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

अकोला : कुंभारी तलाव आटतोय अन् विहीर अधिग्रहणाचा पत्ता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:33 IST

अकोला : अकोल्यातील उद्योगांना पाणी पुरवठा करणारा कुंभारीचा तलाव आटत असून दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनाकडून अजूनही विहीर अधिग्रहणाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्देअजूनही विहीर अधिग्रहणाला सुरुवात झालेली नाही उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील उद्योगांना पाणी पुरवठा करणारा कुंभारीचा तलाव आटत असून दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनाकडून अजूनही विहीर अधिग्रहणाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने अकोला जिल्हय़ातील धरण साठे कोरडे आहेत. जूनपासून ही स्थिती उद्योजक आणि प्रशासनाच्या समोर होती. महान काटेपूर्णा धरणातून अकोला एमआयडीसीतील शेकडो  उद्योगांना पाणी पुरवठा होत असे. दरम्यान, पिण्यासाठी पाणी राखीव केल्याने खांबोरा प्रकल्पाच्या पाणी पुरवठय़ासोबतच एमआयडीसीचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे एमआयडीसीजवळच्या कुंभारी तलावातून उद्योगांना पाणी पुरवठा सुरू झाला. तो अजूनही तीन दिवसांआड काही तासांसाठी सुरू आहे. यादरम्यान अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी आणि जागरूक उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाचे लक्ष आगामी पाणीटंचाईकडे वेधले; मात्र एमआयडीसी प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष दिले नाहीत. त्यामुळे एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडू लागले आहेत. ही बाब एमआयडीसीतील फुड एक्स्पोच्या उद्घाटनादरम्यान उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पंधरवड्यात याप्रकरणी मुंबईत बैठक आयोजीत केली आहे हे विशेष.

मिनरल प्लान्टकडून उपसा सुरूचपाण्याअभावी एमआयडीसीतील उद्योग बंद पडत असले, तरी येथील काही मिनरल प्लान्टकडून पाण्याचा उपसा सातत्याने सुरूच आहे. त्यांचा पाणी उपसा बंद करण्याची आणि परिसरातील विहिरी अधिग्रहित करण्याची गरज अजूनही एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना भासलेली नाही. 

अकोला एमआयडीसीतील पाणी समस्या तातडीने सोडविली गेली नाही, तर मार्चपर्यंत अकोल्यातील ७५ टक्के उद्योग बंद पडतील. याला अकोला एमआयडीसीतील अधिकारी जबाबदार राहतील. पाणीटंचाईची समस्या नैसर्गिक असली, तरी ती सोडविणे अशक्य मुळीच नाही. उद्योगमंत्री यांच्या बैठकीतही विहीर अधिग्रहणाचाच मुद्दा पुढे येणार आहे.-वसंत बाछुका, उद्योजक अकोला.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ