शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अकोला : गारपिटीने पळविला तोंडाशी आलेला घास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:07 IST

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात रब्बी पिकांसह भाजीपाल व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने पळविल्याने, शेतकरी हवालदिल झाला असून, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सोमवारपासून पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान; पंचनामे सुरुआसेगाव बाजार येथील १५0 घरांचे नुकसान शेतकर्‍यांना हवा मदतीचा हात 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात रब्बी पिकांसह भाजीपाल व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने पळविल्याने, शेतकरी हवालदिल झाला असून, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सोमवारपासून पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.रविवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसासह अवकाळी गारपीट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत गहू, हरभरा या रब्बी पिकांसह संत्रा, केळी, टरबूज या फळ पिकांचे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपिटीने कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या शेतातील गहू, हरभर्‍याचे पीक उद्ध्वस्त झाले. हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडून १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५ हजार ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनामार्फत वर्तविण्यात आला आहे. अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करून अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांसह सातही तहसीलदारांना दिला. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सोमवारपासून जिल्ह्यात गारपीटग्रस्त गावांतील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नुकसानाचा अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करा!अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानाचा अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिला. त्यामध्ये पीकनिहाय नुकसानाचे क्षेत्र, बाधित शेतकर्‍यांची संख्या, पीक विम्याचा लाभ घेतलेले शेतकरी व पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकर्‍यांची संख्या इत्यादी माहितीचा अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पीक नुकसानाची मदत द्या; गारपीटग्रस्तांची मागणीअवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने पळविला. त्यामुळे शासनाकडून पीक नुकसानाची मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

घरांचे नुकसान! अवकाळी पाऊस व गारपिटीचा घरांनाही तडाखा बसला आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे १५0 घरांचे अंशत: नुकसान झाल्याचा अहवाल अकोट तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.

या गावांना तडाखा तेल्हारा दानापूर, बेलखेड, पंचगव्हाण, खंडाळा, हिंगणी बु., हिंगणी खु., तळेगाव बाजार, वडगाव, सिरसोली, रायखेड, कोंढा, शेरी, मालठाणा, सांगवी, नेर, निंबोळी, माळेगाव बाजार, हिरवखेड 

अकोला पळसो बढे, निपाणा, कौलखेड जहाँ., भोड, सुकोडा, खडकी, टाकळी, सिसा, मासा बोंदरखेड, डोंगरगाव  

पातूर खेट्री, शिरपूर, चांगेफळ, पिंपळखुटा, राहेर, अडगाव, वहाळा, सावरगाव, चान्नी, उमरा, सुकळी, चतारी, सायवणी, दिग्रस बु., सस्ती 

बाश्रीटाकळी सायखेड, चेलका, धाबा, कान्हेरी सरप, सोनगिरी, सिंदखेड  

बाळापूर अंदुरा, कवठा बहादुरा, निंबा फाटा, बोरगाव वैराळे 

अकोट आसेगाव, सावरा, मंचनपूर, कुटासा, देवरी, मुंडगाव 

मूर्तिजापूर लाईत, दातावी, भटोरी, पारद