शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : गारपिटीने पळविला तोंडाशी आलेला घास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:07 IST

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात रब्बी पिकांसह भाजीपाल व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने पळविल्याने, शेतकरी हवालदिल झाला असून, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सोमवारपासून पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान; पंचनामे सुरुआसेगाव बाजार येथील १५0 घरांचे नुकसान शेतकर्‍यांना हवा मदतीचा हात 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात रब्बी पिकांसह भाजीपाल व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने पळविल्याने, शेतकरी हवालदिल झाला असून, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सोमवारपासून पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.रविवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसासह अवकाळी गारपीट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत गहू, हरभरा या रब्बी पिकांसह संत्रा, केळी, टरबूज या फळ पिकांचे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपिटीने कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या शेतातील गहू, हरभर्‍याचे पीक उद्ध्वस्त झाले. हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडून १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५ हजार ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनामार्फत वर्तविण्यात आला आहे. अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करून अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांसह सातही तहसीलदारांना दिला. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सोमवारपासून जिल्ह्यात गारपीटग्रस्त गावांतील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नुकसानाचा अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करा!अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानाचा अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिला. त्यामध्ये पीकनिहाय नुकसानाचे क्षेत्र, बाधित शेतकर्‍यांची संख्या, पीक विम्याचा लाभ घेतलेले शेतकरी व पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकर्‍यांची संख्या इत्यादी माहितीचा अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पीक नुकसानाची मदत द्या; गारपीटग्रस्तांची मागणीअवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने पळविला. त्यामुळे शासनाकडून पीक नुकसानाची मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

घरांचे नुकसान! अवकाळी पाऊस व गारपिटीचा घरांनाही तडाखा बसला आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे १५0 घरांचे अंशत: नुकसान झाल्याचा अहवाल अकोट तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.

या गावांना तडाखा तेल्हारा दानापूर, बेलखेड, पंचगव्हाण, खंडाळा, हिंगणी बु., हिंगणी खु., तळेगाव बाजार, वडगाव, सिरसोली, रायखेड, कोंढा, शेरी, मालठाणा, सांगवी, नेर, निंबोळी, माळेगाव बाजार, हिरवखेड 

अकोला पळसो बढे, निपाणा, कौलखेड जहाँ., भोड, सुकोडा, खडकी, टाकळी, सिसा, मासा बोंदरखेड, डोंगरगाव  

पातूर खेट्री, शिरपूर, चांगेफळ, पिंपळखुटा, राहेर, अडगाव, वहाळा, सावरगाव, चान्नी, उमरा, सुकळी, चतारी, सायवणी, दिग्रस बु., सस्ती 

बाश्रीटाकळी सायखेड, चेलका, धाबा, कान्हेरी सरप, सोनगिरी, सिंदखेड  

बाळापूर अंदुरा, कवठा बहादुरा, निंबा फाटा, बोरगाव वैराळे 

अकोट आसेगाव, सावरा, मंचनपूर, कुटासा, देवरी, मुंडगाव 

मूर्तिजापूर लाईत, दातावी, भटोरी, पारद