शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अकोला : अखेर ४०० सिंचन विहीर लाभार्थींना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:23 IST

अकोला : सिंचन विहिरींच्या कामाच्या मोबदल्यापासून वंचित ठेवलेल्या पातूर तालुक्यातील १५४, बाळापूर तालुक्यातील २४५ शेतकºयांना देयक अदा करा, तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाईचा प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याचे पत्र दोन्ही गटविकास अधिका-यांना दिल्यानंतरच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कक्षातून बाहेर पडले. त्यांच्या ठिय्या आंदोलनाच्या पवित्र्याने दोन्ही तालुक्यांतील जवळपास ४०० शेतक-यांना न्याय मिळाला. 

ठळक मुद्देसेना जिल्हाप्रमुख देशमुख यांचे आंदोलन कारवाईसह दोन दिवसांत देयक मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिंचन विहिरींच्या कामाच्या मोबदल्यापासून वंचित ठेवलेल्या पातूर तालुक्यातील १५४, बाळापूर तालुक्यातील २४५ शेतक-यांना देयक अदा करा, तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाईचा प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याचे पत्र दोन्ही गटविकास अधिकाºयांना दिल्यानंतरच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कक्षातून बाहेर पडले. त्यांच्या ठिय्या आंदोलनाच्या पवित्र्याने दोन्ही तालुक्यांतील जवळपास ४०० शेतक-यांना न्याय मिळाला. गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देण्यात आली, त्याचवेळी अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे शेकडो शेतकºयांना सिंचन विहीर योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. देयकासाठी चकरा मारणाºया शेतकºयांना न्याय मिळण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ७ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी ही समस्या सोडवण्यासाठी १४ मार्च रोजी बैठक बोलावण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती,  रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, दोन्ही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्यासह देशमुख आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी घेतलेल्या आढावा आणि चर्चेतून त्या लाभार्थींना तातडीने देयक अदा करण्याचे ठरले. आधी ज्या लाभार्थींना देयक अदा झाले, त्या सर्वांना देयक मिळणार आहेत. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील २४५, पातूर तालुक्यातील १५४ शेतकºयांचा समावेश आहे. सोबतच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या लक्ष्यांकापेक्षा अधिक मंजुरी दिलेल्या मात्र, वर्क कोड न मिळालेल्या विहिरींना नियमानुकूल करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी देणारे तत्कालीन गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्तावही दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले. ते पत्र मिळाल्यानंतरच देशमुख यांनी ठिय्या आंदोलन मागे घेत कार्यालयातून बाहेर पडले.  

टॅग्स :Akolaअकोला