शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अकोला जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गुलदस्त्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:53 IST

अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी नुकसानाचे केवळ चार तालुक्यातील अहवाल सोमवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून, उर्वरित तीन तालुक्यातील नुकसानाचे अहवाल अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

ठळक मुद्देचार तालुक्यांतील नुकसानाचे अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी नुकसानाचे केवळ चार तालुक्यातील अहवाल सोमवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून, उर्वरित तीन तालुक्यातील नुकसानाचे अहवाल अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे.राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे आणि  तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्‍यांना पीक नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुषंगाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून, संयुक्त स्वाक्षरीसह पीक नुकसानाचे अहवाल २६ डिसेंबरपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत ८ डिसेंबर रोजी जिल्हय़ातील तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकार्‍यांना दिला होता; परंतु १ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील सातपैकी अकोला, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी व पातूर या चारच तालुक्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकार्‍यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. उर्वरित अकोट, तेल्हारा व बाळापूर या तीन तालुक्यातील संयुक्त स्वाक्षरीचे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल अद्यापही सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचा एकीकृत अहवाल सोमवारपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांमार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे सादर होऊ शकला नाही. त्यानुषंगाने जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल अद्याप प्रशासनाच्या गुलदस्त्यातच अडकला आहे.

अकोट, तेल्हारा, बाळापूर तालुक्याची प्रतीक्षा जिल्हय़ातील चार तालुक्यातील कपाशी नुकसानाचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले; मात्र अकोट, तेल्हारा व बाळापूर या तीन तालुक्यातील कपाशी नुकसानाचे संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकार्‍यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल अद्याप रखडले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यातील कपाशी नुकसानाचे रखडलेले अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोनच तहसीलदारांनी दिले ‘शो-कॉज’चे उत्तर!कपाशी पीक नुकसानाचे अहवाल २६ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात आले नसल्याने, जिल्हय़ातील तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकार्‍यांना गत २७ डिसेंबर रोजी कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावून, ३0 डिसेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला होता. १ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या दोनच तहसीलदारांचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, इतर संबंधित अधिकार्‍यांचे स्पष्टीकरण अद्यापही प्राप्त झाले नाही.

शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा?जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचा अहवाल अद्याप जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचा अहवाल शासनाकडे केव्हा सादर करण्यात येणार आणि जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदत केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.-

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणcottonकापूस