शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अकोला जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गुलदस्त्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:53 IST

अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी नुकसानाचे केवळ चार तालुक्यातील अहवाल सोमवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून, उर्वरित तीन तालुक्यातील नुकसानाचे अहवाल अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

ठळक मुद्देचार तालुक्यांतील नुकसानाचे अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी नुकसानाचे केवळ चार तालुक्यातील अहवाल सोमवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून, उर्वरित तीन तालुक्यातील नुकसानाचे अहवाल अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे.राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे आणि  तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्‍यांना पीक नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुषंगाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून, संयुक्त स्वाक्षरीसह पीक नुकसानाचे अहवाल २६ डिसेंबरपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत ८ डिसेंबर रोजी जिल्हय़ातील तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकार्‍यांना दिला होता; परंतु १ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील सातपैकी अकोला, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी व पातूर या चारच तालुक्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकार्‍यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. उर्वरित अकोट, तेल्हारा व बाळापूर या तीन तालुक्यातील संयुक्त स्वाक्षरीचे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल अद्यापही सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचा एकीकृत अहवाल सोमवारपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांमार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे सादर होऊ शकला नाही. त्यानुषंगाने जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल अद्याप प्रशासनाच्या गुलदस्त्यातच अडकला आहे.

अकोट, तेल्हारा, बाळापूर तालुक्याची प्रतीक्षा जिल्हय़ातील चार तालुक्यातील कपाशी नुकसानाचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले; मात्र अकोट, तेल्हारा व बाळापूर या तीन तालुक्यातील कपाशी नुकसानाचे संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकार्‍यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल अद्याप रखडले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यातील कपाशी नुकसानाचे रखडलेले अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोनच तहसीलदारांनी दिले ‘शो-कॉज’चे उत्तर!कपाशी पीक नुकसानाचे अहवाल २६ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात आले नसल्याने, जिल्हय़ातील तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकार्‍यांना गत २७ डिसेंबर रोजी कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावून, ३0 डिसेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला होता. १ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या दोनच तहसीलदारांचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, इतर संबंधित अधिकार्‍यांचे स्पष्टीकरण अद्यापही प्राप्त झाले नाही.

शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा?जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचा अहवाल अद्याप जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचा अहवाल शासनाकडे केव्हा सादर करण्यात येणार आणि जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदत केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.-

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणcottonकापूस