शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा : शौचालये बांधली, पण वापरच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:50 IST

अकोला : ‘जहाँ सोच वही शौचालय’ नारा देत ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठीचे उद्दीष्ट्ये संबंधित विभागाला देण्यात आली आहे. तथापि अत्यंत सुमार दर्जाचे बांधकाम केले जात असून, त्या शौचालयांचा वापर काही ग्रामस्थ जळतन व इतर घरगुती साहित्य ठेवण्यासाठी करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले. 

ठळक मुद्देउदासीनता : जिल्ह्यात अनेक शौचालयांचा वापर केला जातो साहित्य ठेवण्यासाठीस्टिंग ऑपरेशन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘जहाँ सोच वही शौचालय’ नारा देत ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठीचे उद्दीष्ट्ये संबंधित विभागाला देण्यात आली आहे. तथापि अत्यंत सुमार दर्जाचे बांधकाम केले जात असून, त्या शौचालयांचा वापर काही ग्रामस्थ जळतन व इतर घरगुती साहित्य ठेवण्यासाठी करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले. ग्रामीण भागामध्ये गावे हगणदरीमुक्त करण्यासाठी शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात जिल्हाभरात अनेक ठिकाणी दर्जाहीन शौचालयांची निर्मिती होत आहे. एवढेच नव्हे, तर सरकारी अधिकारी आणि कर्मचारी शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे कागदावर शौचालये बांधण्यात येत असली, तरी अनेक गावांमध्ये त्याचा वापरच होत नसल्याचे धक्कादायक चित्र  जिल्ह्यातील ४0 गावांमध्ये समोर आले आहे. ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता अजूनही बदलली नसल्याचे शौचालये बांधलेली असूनही ग्रामस्थ उघड्यावरच शौचास जात असल्याचे चित्र आहे. तसेच बांधलेल्या शौचालयांचा वापर साहित्य ठेवण्यासाठी, स्नानगृहांसाठी तर कुठे कुठे चक्क  कोंबड्या ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. अकोटमध्ये सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी २१ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला, तरीही शौचालयांची बिकट अवस्था कायम असल्याचे आढळले. बाळापुरात उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लाभार्थींचे कागदपत्रेही पाहण्यात आले नाही. शहरात अतिक्रमित जागांवरही शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. आगरसह परिसरातील आठ गावांमध्ये शौचालये शो पीस असल्याचे आढळले. वाडी अदमपूरमध्ये शौचालयांचा वापर केवळ अनुदान लाटण्यासाठी केला जात असल्याचे चित्र आहे. व्याळा येथे ४0 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामस्थ अजूनही उघड्यावरच शौचास जात असल्याचे चित्र आहे. चोहोट्टा बाजार येथे कागदावर शौचालये पूर्ण झाली असल्याचे दाखवण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती गंभीर आहे. अनेकांकडे शौचायचे नसल्याचे समोर आले. मुंडगावात ६0 टक्के शौचालयांची कामे अर्धवट आहेत. तळेगावात खासगी कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे शौचालये पुरवण्यात येत आहेत. हिवरखेडमध्ये १४00 लाभार्थींची यादी मंजूर असली तरी ७00 पेक्षा कमी लाभार्थींनी प्रत्यक्षात शौचलये बांधली आहेत. पिंजरपासून जवळच असलेल्या वडगाव येथे केवळ एका सिमेंटच्या बोरीमध्ये संपूर्ण शौचालयांचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा दर्जाचा विचार न केलेला बरा. डोंगरगाव परिसरात अनेक शौचालयांची छतच गायब असल्याचे आढळले. तसेच काही शौचालयांमध्ये अडगळीतील साहित्य ठेवण्यात येत आहे. वल्लभनगर परिसरात अनेक शौचालये कागदावरच पूर्ण दाखवण्यात आली आहे. शिर्ला, लोहारा, निंबा फाटा, वाडेगाव, सायखेड व परिसरातील आठ गावांमध्ये अनेक ग्रामस्थ शौचालयांचा वापरच करीत नसल्याचे चित्र आहे. मधापुरीत अनेक शौचालयांना छतच नसल्याचे चित्र आहे. 

जुन्याच शौचालयांवर लाटले अनुदान!लोहारासह  येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मिळणारे अनुदान लाटण्यासाठी जुनेच शौचालय दाखवण्यात आले, तर व्याळा येथे २0१५ पूर्वी शौचालय बांधल्यानंतर देण्यात येणार्‍या प्रोत्साहन निधीत मोठा घोळ झाला आहे.निंभोरा येथे ५0 टक्के शौचालयांचेच काम पूर्ण करण्यात आले आहेत. अकोटात अनेक सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व रंगरंगोटीत जुन्याचे नवे करून २१ लाख रुपयांचा डल्ला पालिकेच्या तिजोरीवर मारण्यात आला आहे. 

ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालयही बंद ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशनचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावरही टाकण्यात आली आहे; मात्र सिरसोली ग्रामपंचायतच्या कार्यालयात असलेले शौचालयच वापरात नसल्याचे चित्र आहे. पाइप व इतर साहित्य या शौचालयात ठेवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी शौचालयांचा वापर जळतन ठेवण्यासाठी, इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण