शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

दहावीच्या कलमापनात चाचणीत अकोला जिल्ह्याचा निकाल ८७ टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:01 IST

कलमापन चाचणीमध्ये जिल्ह्याचा एकूण निकाल ८७ टक्के लागला असून, यात अकोट व तेल्हारा तालुका निकालात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: इयत्ता दहावीची परीक्षा आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात किती टक्के, गुण मिळतील, निकाल चांगला लागला नाही तर पालकांचा रोष ओढावेल, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावते; परंतु विद्यार्थ्यांची ही चिंता कलमापन चाचणीमुळे दूर झाली आहे. कलमापन चाचणीच्या निकालामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षेत किती गुण मिळतील, याचा अंदाजच विद्यार्थ्यांना आला आहे. कलमापन चाचणीमध्ये जिल्ह्याचा एकूण निकाल ८७ टक्के लागला असून, यात अकोट व तेल्हारा तालुका निकालात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा झाल्यावर दोन महिने उन्हाळ्याची सुटी विद्यार्थ्यांना मिळते. त्यानंतर दहावीचा निकाल लागतो. परीक्षा झाल्यावर दहावी परीक्षेत किती गुण, टक्के मिळतील, अशी विद्यार्थ्यांना चिंता सतावते. चांगले गुण मिळाल्यावर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, याचा अंदाज विद्यार्थ्यांसोबत पालकसुद्धा काढतात. यंदा राज्य शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे, व्यावसायिक मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आणि श्यामची आई फाउंडेशनच्यावतीने दहावी परीक्षेपूर्वी जिल्ह्यातील ३१ हजार १४७ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ८0 विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेतली होती. या कलमापन चाचणीचा १६ मार्च रोजी निकाल जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ८७ टक्के लागला आहे. यामध्ये अकोट तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८९.१ टक्के लागला असून, त्याखालोखाल तेल्हारा तालुक्याचा निकाल ८८.१७ टक्के लागला. इयत्ता दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच कलमापन चाचणीतून जिल्ह्याची दहावीतील शैक्षणिक प्रगती समोर आली आहे. कलमापन चाचणीमुळे दहावीतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे कोणत्या शाखेकडे जायचे, हे आतापासून निश्चित करता येणार आहे. पालकांनासुद्धा दहावीच्या निकालापूर्वीच पाल्यांची प्रगती किती आहे, हे कळले आहे. शासनानेसुद्धा मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समुपदेशन कक्षामध्ये विद्यार्थी व पालकांना करिअरविषयक समुपदेशन उपलब्ध करून दिले आहे.

दहावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेण्यात आली. चाचणीत मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेकडे आहे, हे स्पष्ट झाले. त्यानुसार स्थापन केलेल्या कक्षात विद्यार्थी व पालकांना समुपदेशन करण्यात येत आहे.डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था. 

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी