शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या कलमापनात चाचणीत अकोला जिल्ह्याचा निकाल ८७ टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:01 IST

कलमापन चाचणीमध्ये जिल्ह्याचा एकूण निकाल ८७ टक्के लागला असून, यात अकोट व तेल्हारा तालुका निकालात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: इयत्ता दहावीची परीक्षा आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात किती टक्के, गुण मिळतील, निकाल चांगला लागला नाही तर पालकांचा रोष ओढावेल, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावते; परंतु विद्यार्थ्यांची ही चिंता कलमापन चाचणीमुळे दूर झाली आहे. कलमापन चाचणीच्या निकालामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षेत किती गुण मिळतील, याचा अंदाजच विद्यार्थ्यांना आला आहे. कलमापन चाचणीमध्ये जिल्ह्याचा एकूण निकाल ८७ टक्के लागला असून, यात अकोट व तेल्हारा तालुका निकालात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा झाल्यावर दोन महिने उन्हाळ्याची सुटी विद्यार्थ्यांना मिळते. त्यानंतर दहावीचा निकाल लागतो. परीक्षा झाल्यावर दहावी परीक्षेत किती गुण, टक्के मिळतील, अशी विद्यार्थ्यांना चिंता सतावते. चांगले गुण मिळाल्यावर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, याचा अंदाज विद्यार्थ्यांसोबत पालकसुद्धा काढतात. यंदा राज्य शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे, व्यावसायिक मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आणि श्यामची आई फाउंडेशनच्यावतीने दहावी परीक्षेपूर्वी जिल्ह्यातील ३१ हजार १४७ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ८0 विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेतली होती. या कलमापन चाचणीचा १६ मार्च रोजी निकाल जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ८७ टक्के लागला आहे. यामध्ये अकोट तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८९.१ टक्के लागला असून, त्याखालोखाल तेल्हारा तालुक्याचा निकाल ८८.१७ टक्के लागला. इयत्ता दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच कलमापन चाचणीतून जिल्ह्याची दहावीतील शैक्षणिक प्रगती समोर आली आहे. कलमापन चाचणीमुळे दहावीतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे कोणत्या शाखेकडे जायचे, हे आतापासून निश्चित करता येणार आहे. पालकांनासुद्धा दहावीच्या निकालापूर्वीच पाल्यांची प्रगती किती आहे, हे कळले आहे. शासनानेसुद्धा मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समुपदेशन कक्षामध्ये विद्यार्थी व पालकांना करिअरविषयक समुपदेशन उपलब्ध करून दिले आहे.

दहावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेण्यात आली. चाचणीत मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेकडे आहे, हे स्पष्ट झाले. त्यानुसार स्थापन केलेल्या कक्षात विद्यार्थी व पालकांना समुपदेशन करण्यात येत आहे.डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था. 

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी