शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील गरिबांच्या माथी मारण्यात येत आहे निकृष्ट तूर डाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:20 IST

अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील चार तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ किलो रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. पांढरी टरफले आणि शिजण्यास विलंब लागणारी ही तूर डाळ असल्याने निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरिबांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ातील चार तालुक्यांत शिधापत्रिकाधारकांना तूर डाळीचे वाटप सुरू

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील चार तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ किलो रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. पांढरी टरफले आणि शिजण्यास विलंब लागणारी ही तूर डाळ असल्याने निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरिबांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.बाजार हस्तक्षेप योजनेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थींना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये प्रतिकिलो दराने तूर डाळ वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत ५00 क्विंटल तूर डाळीची मागणी करण्यात आली. त्यापैकी ८ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील अकोला, बाश्रीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांसाठी ३५0 क्विंटल तूर डाळ महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनद्वारे जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांमार्फत प्राप्त झाली. जिल्हा पुरवठा विभागामार्फत चारही तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून उपलब्ध तूर डाळीचे वाटप शिधापत्रिकाधारकांना सुरू करण्यात आले. रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये किलो दराने वाटप करण्यात येत असलेल्या या तूर डाळीमध्ये पांढरी टरफले आहेत, तसेच बारीक दाणे असलेली ही डाळ शिजण्यासही विलंब लागतो. त्यामुळे बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत रास्त भाव दुकानांमधून निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. 

शासनाकडून प्राप्त तूर डाळीचे वाटप ५५ रुपये किलो दराने रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येत आहे; परंतु बारीक असलेल्या या तूर डाळीमध्ये पांढरी टरफले असून, ही डाळ शिजण्यास विलंब लागतो. त्यामुळे शासकीय प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतरच ही तूर डाळ वाटप करण्यासाठी रास्त भाव दुकानांना दिली पाहिजे.-शत्रुघ्न मुंडे,अध्यक्ष, जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना

बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हय़ातील चार तालुक्यांतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडून जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांमार्फत आतापर्यंत ३५0 क्विंटल तूर डाळ प्राप्त झाली आहे. उपलब्ध तूर डाळीचे वाटप रस्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारक लाभार्थींना करण्यात येत आहे.डाळ निकृष्ट असल्याबाबत तक्रार प्राप्त नाही.तक्र ार आल्यास चौकशी करू-संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण