शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अकोला जिल्हय़ातील गरिबांच्या माथी मारण्यात येत आहे निकृष्ट तूर डाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:20 IST

अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील चार तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ किलो रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. पांढरी टरफले आणि शिजण्यास विलंब लागणारी ही तूर डाळ असल्याने निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरिबांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ातील चार तालुक्यांत शिधापत्रिकाधारकांना तूर डाळीचे वाटप सुरू

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील चार तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ किलो रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. पांढरी टरफले आणि शिजण्यास विलंब लागणारी ही तूर डाळ असल्याने निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरिबांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.बाजार हस्तक्षेप योजनेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थींना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये प्रतिकिलो दराने तूर डाळ वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत ५00 क्विंटल तूर डाळीची मागणी करण्यात आली. त्यापैकी ८ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील अकोला, बाश्रीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांसाठी ३५0 क्विंटल तूर डाळ महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनद्वारे जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांमार्फत प्राप्त झाली. जिल्हा पुरवठा विभागामार्फत चारही तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून उपलब्ध तूर डाळीचे वाटप शिधापत्रिकाधारकांना सुरू करण्यात आले. रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये किलो दराने वाटप करण्यात येत असलेल्या या तूर डाळीमध्ये पांढरी टरफले आहेत, तसेच बारीक दाणे असलेली ही डाळ शिजण्यासही विलंब लागतो. त्यामुळे बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत रास्त भाव दुकानांमधून निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. 

शासनाकडून प्राप्त तूर डाळीचे वाटप ५५ रुपये किलो दराने रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येत आहे; परंतु बारीक असलेल्या या तूर डाळीमध्ये पांढरी टरफले असून, ही डाळ शिजण्यास विलंब लागतो. त्यामुळे शासकीय प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतरच ही तूर डाळ वाटप करण्यासाठी रास्त भाव दुकानांना दिली पाहिजे.-शत्रुघ्न मुंडे,अध्यक्ष, जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना

बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हय़ातील चार तालुक्यांतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडून जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांमार्फत आतापर्यंत ३५0 क्विंटल तूर डाळ प्राप्त झाली आहे. उपलब्ध तूर डाळीचे वाटप रस्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारक लाभार्थींना करण्यात येत आहे.डाळ निकृष्ट असल्याबाबत तक्रार प्राप्त नाही.तक्र ार आल्यास चौकशी करू-संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण