शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अकोला जिल्हा : वेळेवर उपचार न मिळाल्याने मळसूर आरोग्य केंद्रात चार महिन्याच्या बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 15:51 IST

मळसुर: वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी घडली.

ठळक मुद्देवेदांत सुमीत कंकाळ नामक बालकाला मंगळवारी सकाळी मळसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले.सकाळी दोन पैकी एकही वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर उपस्थित नव्हते.बालकाच्या पालकांनी १०८ क्रमांकाच्या गाडीसाठीही फोन केला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोग्य सेवेबद्दल संताप व्यक्त केला.तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.

मळसुर: वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोग्य सेवेबद्दल संताप व्यक्त केला. दरम्यान, तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.वेदांत सुमीत कंकाळ (वय ४ महिने) नामक बालकाला मंगळवारी सकाळी त्याच्या आई - वडिलांनी साडेआठ वाजताच्या सुमारास मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले; मात्र त्यावेळी या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाºया बागवान आणि पी.डी. मोरे या दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांपैकी एकही उपस्थित नव्हता. एवढेच नव्हे तर तेथे कार्यरत नियमित आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेविका यांच्यापैकीही कोणीच हजर नव्हते. केवळ तेथील शिपाई उपस्थित होता. त्यामुळे नजीकच असणाºया आयुर्वेदिक दवाखान्यातील महिला डॉक्टर सुनयना यांना पाचारण करण्यात आले; मात्र त्यादेखील उशीराने पोहोचल्या. त्या पोहोचेपर्यंत बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. संबंधित महिला डॉक्टरने बालकाची तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. शासनाद्वारे ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मोठा गवगवा करुन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या १०८ क्रमांकाच्या गाडीसाठीही बालकाच्या पालकांनी फोन केला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. या बालकावर यापूर्वी औरंगाबाद येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती.बालकांचे शवविच्छेदन करण्यास पालकांचा नकारउपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्यसेवेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मळसूर गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी पोलिसांना पाचारण करावे लागले. नातेवाईकांनी बालकाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण