शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

अकोला जिल्हा : वेळेवर उपचार न मिळाल्याने मळसूर आरोग्य केंद्रात चार महिन्याच्या बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 15:51 IST

मळसुर: वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी घडली.

ठळक मुद्देवेदांत सुमीत कंकाळ नामक बालकाला मंगळवारी सकाळी मळसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले.सकाळी दोन पैकी एकही वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर उपस्थित नव्हते.बालकाच्या पालकांनी १०८ क्रमांकाच्या गाडीसाठीही फोन केला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोग्य सेवेबद्दल संताप व्यक्त केला.तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.

मळसुर: वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोग्य सेवेबद्दल संताप व्यक्त केला. दरम्यान, तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.वेदांत सुमीत कंकाळ (वय ४ महिने) नामक बालकाला मंगळवारी सकाळी त्याच्या आई - वडिलांनी साडेआठ वाजताच्या सुमारास मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले; मात्र त्यावेळी या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाºया बागवान आणि पी.डी. मोरे या दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांपैकी एकही उपस्थित नव्हता. एवढेच नव्हे तर तेथे कार्यरत नियमित आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेविका यांच्यापैकीही कोणीच हजर नव्हते. केवळ तेथील शिपाई उपस्थित होता. त्यामुळे नजीकच असणाºया आयुर्वेदिक दवाखान्यातील महिला डॉक्टर सुनयना यांना पाचारण करण्यात आले; मात्र त्यादेखील उशीराने पोहोचल्या. त्या पोहोचेपर्यंत बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. संबंधित महिला डॉक्टरने बालकाची तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. शासनाद्वारे ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मोठा गवगवा करुन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या १०८ क्रमांकाच्या गाडीसाठीही बालकाच्या पालकांनी फोन केला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. या बालकावर यापूर्वी औरंगाबाद येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती.बालकांचे शवविच्छेदन करण्यास पालकांचा नकारउपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्यसेवेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मळसूर गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी पोलिसांना पाचारण करावे लागले. नातेवाईकांनी बालकाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण