शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अकोला जिल्ह्यातील दुष्काळ विधानसभेत गाजला!

By admin | Updated: March 11, 2016 03:10 IST

अकोला जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करा; रणधीर सावरकर यांची मागणी.

अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोला जिल्ह्यातील ९९७ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असताना केवळ ५५ गावांचा दुष्काळग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील हजारो दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना अर्थसाहाय्य देताना झालेला भेदभाव शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत केली. जिल्ह्यातील २0१५-२0१६ मध्ये पैसेवारी ४२ पैसे असतानासुद्धा जिल्ह्यातील ९९७ गावांपैकी ५५ गावांना अर्थसाहाय्य देण्यात आले. ९४२ गावांना या शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहेत. या संदर्भात विभागीय व जिल्ह्यातून महसूल विभागातर्फे माहिती देताना कोणती अनियमितता झाली, याची चौकशी करून हवालदिल शेतकर्‍याला मदतीचा हात शासनाने द्यावा, अशी मागणी आ. सावरकर यांनी उचलून धरली. तीन वर्षांपासून शेतकरी नापिकी आणि दुष्काळामुळे त्रस्त आहे. या देशातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यामुळे दुष्काळाने आलेल्या मंदीचा फटका शहरी भागातसुद्धा पडत आहे. यामुळे शेतकर्‍यांसोबत सर्वसामान्य नागरिकसुद्धा हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांच्या भावना समजून अकोला जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावांतील शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आ. सावरकर यांनी केली. या बाबत कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचल्या असून, शेतकर्‍यांना शासन वार्‍यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहील, असे आश्‍वासन दिले.