शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

अकोला जिल्ह्यातील दुष्काळ विधानसभेत गाजला!

By admin | Updated: March 11, 2016 03:10 IST

अकोला जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करा; रणधीर सावरकर यांची मागणी.

अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोला जिल्ह्यातील ९९७ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असताना केवळ ५५ गावांचा दुष्काळग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील हजारो दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना अर्थसाहाय्य देताना झालेला भेदभाव शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत केली. जिल्ह्यातील २0१५-२0१६ मध्ये पैसेवारी ४२ पैसे असतानासुद्धा जिल्ह्यातील ९९७ गावांपैकी ५५ गावांना अर्थसाहाय्य देण्यात आले. ९४२ गावांना या शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहेत. या संदर्भात विभागीय व जिल्ह्यातून महसूल विभागातर्फे माहिती देताना कोणती अनियमितता झाली, याची चौकशी करून हवालदिल शेतकर्‍याला मदतीचा हात शासनाने द्यावा, अशी मागणी आ. सावरकर यांनी उचलून धरली. तीन वर्षांपासून शेतकरी नापिकी आणि दुष्काळामुळे त्रस्त आहे. या देशातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यामुळे दुष्काळाने आलेल्या मंदीचा फटका शहरी भागातसुद्धा पडत आहे. यामुळे शेतकर्‍यांसोबत सर्वसामान्य नागरिकसुद्धा हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांच्या भावना समजून अकोला जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावांतील शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आ. सावरकर यांनी केली. या बाबत कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचल्या असून, शेतकर्‍यांना शासन वार्‍यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहील, असे आश्‍वासन दिले.