शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अकोला जिल्ह्यातील दुष्काळ विधानसभेत गाजला!

By admin | Updated: March 11, 2016 03:10 IST

अकोला जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करा; रणधीर सावरकर यांची मागणी.

अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोला जिल्ह्यातील ९९७ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असताना केवळ ५५ गावांचा दुष्काळग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील हजारो दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना अर्थसाहाय्य देताना झालेला भेदभाव शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत केली. जिल्ह्यातील २0१५-२0१६ मध्ये पैसेवारी ४२ पैसे असतानासुद्धा जिल्ह्यातील ९९७ गावांपैकी ५५ गावांना अर्थसाहाय्य देण्यात आले. ९४२ गावांना या शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहेत. या संदर्भात विभागीय व जिल्ह्यातून महसूल विभागातर्फे माहिती देताना कोणती अनियमितता झाली, याची चौकशी करून हवालदिल शेतकर्‍याला मदतीचा हात शासनाने द्यावा, अशी मागणी आ. सावरकर यांनी उचलून धरली. तीन वर्षांपासून शेतकरी नापिकी आणि दुष्काळामुळे त्रस्त आहे. या देशातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यामुळे दुष्काळाने आलेल्या मंदीचा फटका शहरी भागातसुद्धा पडत आहे. यामुळे शेतकर्‍यांसोबत सर्वसामान्य नागरिकसुद्धा हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांच्या भावना समजून अकोला जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावांतील शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आ. सावरकर यांनी केली. या बाबत कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचल्या असून, शेतकर्‍यांना शासन वार्‍यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहील, असे आश्‍वासन दिले.