शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

अकोला जिल्हा परिषद ६१ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार!

By admin | Updated: January 6, 2015 01:40 IST

दोन वर्षांपासून योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत पडली बंद.

संतोष येलकर / अकोला: जिल्ह्यात ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत सुरू करण्यात आलेली ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत सोडून देण्यात आली आहे. ही अपूर्ण कामे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात या कामांचे प्रस्ताव नव्याने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. भारत निर्माण व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शासन निधीतून ग्रामपंचायत स्तरावरील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे केली जातात. जिल्ह्यात गत दोन वर्षांत मंजूर २१५ पाणीपुरवठा योजनांच्या कामांपैकी १८९ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ७0 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ५८ पाणीपुरवठा योजनांची कामे सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत. तर ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होण्यापूर्वीच बंद पडली आहेत. ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून सुरू करण्यात आलेली पाणीपुरवठा योजनांची ही कामे निधी उपलब्ध असताना अपूर्ण अवस्थेतच बंद पडली आहेत. त्यामुळे संबंधित गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांकडून काढून जिल्हा परिषदमार्फत पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे. ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत सुरू करण्यात आलेली; मात्र अपूर्ण स्थितीत बंद पडलेली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून काढून घेण्यात येतील. तसेच अपूर्ण अवस्थेत बंद पडलेली ही कामे पूर्ण करण्यासाठी नव्याने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत प्रस्तावित करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांनी सांगीतले.