शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

अकोला जिल्हा परिषद ६१ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार!

By admin | Updated: January 6, 2015 01:40 IST

दोन वर्षांपासून योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत पडली बंद.

संतोष येलकर / अकोला: जिल्ह्यात ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत सुरू करण्यात आलेली ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत सोडून देण्यात आली आहे. ही अपूर्ण कामे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात या कामांचे प्रस्ताव नव्याने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. भारत निर्माण व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शासन निधीतून ग्रामपंचायत स्तरावरील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे केली जातात. जिल्ह्यात गत दोन वर्षांत मंजूर २१५ पाणीपुरवठा योजनांच्या कामांपैकी १८९ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ७0 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ५८ पाणीपुरवठा योजनांची कामे सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत. तर ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होण्यापूर्वीच बंद पडली आहेत. ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून सुरू करण्यात आलेली पाणीपुरवठा योजनांची ही कामे निधी उपलब्ध असताना अपूर्ण अवस्थेतच बंद पडली आहेत. त्यामुळे संबंधित गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांकडून काढून जिल्हा परिषदमार्फत पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे. ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत सुरू करण्यात आलेली; मात्र अपूर्ण स्थितीत बंद पडलेली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून काढून घेण्यात येतील. तसेच अपूर्ण अवस्थेत बंद पडलेली ही कामे पूर्ण करण्यासाठी नव्याने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत प्रस्तावित करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांनी सांगीतले.