शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

अकोला जिल्हा परिषद ६१ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार!

By admin | Updated: January 6, 2015 01:40 IST

दोन वर्षांपासून योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत पडली बंद.

संतोष येलकर / अकोला: जिल्ह्यात ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत सुरू करण्यात आलेली ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत सोडून देण्यात आली आहे. ही अपूर्ण कामे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात या कामांचे प्रस्ताव नव्याने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. भारत निर्माण व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शासन निधीतून ग्रामपंचायत स्तरावरील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे केली जातात. जिल्ह्यात गत दोन वर्षांत मंजूर २१५ पाणीपुरवठा योजनांच्या कामांपैकी १८९ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ७0 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ५८ पाणीपुरवठा योजनांची कामे सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत. तर ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होण्यापूर्वीच बंद पडली आहेत. ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून सुरू करण्यात आलेली पाणीपुरवठा योजनांची ही कामे निधी उपलब्ध असताना अपूर्ण अवस्थेतच बंद पडली आहेत. त्यामुळे संबंधित गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांकडून काढून जिल्हा परिषदमार्फत पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे. ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत सुरू करण्यात आलेली; मात्र अपूर्ण स्थितीत बंद पडलेली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून काढून घेण्यात येतील. तसेच अपूर्ण अवस्थेत बंद पडलेली ही कामे पूर्ण करण्यासाठी नव्याने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत प्रस्तावित करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांनी सांगीतले.