शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर तीन लाखांसाठी जप्ती!

By admin | Updated: November 12, 2014 01:08 IST

थकीत रक्कम देण्याचे आश्‍वासन; नामुष्की टाळली.

अकोला : प्रकल्पग्रस्तांच्या थकीत तीन लाख रुपयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी जप्तीची नामुष्की ओढवली होती. अखेर थकीत रकमेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर ही नामुष्की टळली. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत मूर्तिजापूर तालुक्यात पेन येथे गावतलावाचे काम करण्यात आले. या प्रकल्पात ज्यांची जमीन गेली, त्यांना वेळेत मोबदला मिळाला नाही. अशाच प्रकल्पग्रस्तांपैकी अताउल्लाखाँ आणि फातिम अली यांनी दोन वर्षांपूर्वी न्यायालयात धाव घेतली होती. शासनाकडून त्यांना ३ लाख ३६ हजार ८९५ रुपये घेणे आहे. या रकमेच्या बदल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार प्रकल्पग्रस्त मंगळवारी बेलीफसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आले. जप्ती आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. अखेर या प्रकरणात रक्कम उपलब्ध करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यानंतर जप्तीची नामुष्की टळली.