शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

जिल्हाधिकाऱ्यांना झोंबले मोर्णा महोत्सवाचे अपयश;पत्रकारांना बंगल्यावर बोलावून केला अपमान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:17 PM

अकोला: शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवास भरभरून प्रसिद्धी न दिल्याने पित्त खवळलेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी वर्तमानपत्रांचे संपादक व पत्रकारांना चहापाण्यासाठी बंगल्यावर बोलावून रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दूपारी अकोला शहरातील सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकांना चहापाण्यासाठी आमंत्रीत केले. प्रथम दूषित पाणी असलेले प्याले बोलावले. ते पत्रकारांच्या हाती दिले व जादू बघा, असे म्हणाले. तुमच्या नोकऱ्यांशी इमान बाळगा, त्या कधीही जाऊ शकतील, अशी भाषा वापरण्यास सुरवात केली.

अकोला : शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवास भरभरून प्रसिद्धी न दिल्याने पित्त खवळलेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी वर्तमानपत्रांचे संपादक व पत्रकारांना चहापाण्यासाठी बंगल्यावर बोलावून रोष व्यक्त केला. त्यासाठी संपादक व पत्रकारांच्या हाती चक्क दूषित पाणी भरलेले प्याले देण्याचा, तसेच धूर करून पत्रकारांचे स्वागत करण्याचा बालीशपणाही त्यांनी केला.जिल्हाधिका?्यांनी सुरू केलेल्या मोर्णा स्वच्छता अभियानास वर्तमानपत्रांनी भरभरून प्रसिद्धी दिल्यामुळे थेट पंतप्रधानांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर मोर्णा महोत्सवाच्या नावाखाली नुकतेच अकोल्यात तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमांना प्रसारमाध्यमांनी यथोचित प्रसिद्धी दिली; मात्र जिल्हाधिका?्यांच्या मते ती पुरेशी नव्हती. त्यामुळे पित्त खवळलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनीसोमवारी दूपारी अकोला शहरातील सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकांना चहापाण्यासाठी आमंत्रीत केले. जे संपादक शहरात नव्हते त्यांनी किमान प्रतिनिधी तरी पाठवावा असा आग्रह धरण्यात आला. त्यानुसार काही वर्तमानपत्रांचे संपादक आणि काही वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी जिल्हाधिका?्याच्या निवासस्थानी पोहोचले. गजानन नारे, मधु जाधव व अशोक ढेरे ही मोर्णा महोत्सवाची आयोजक त्रयी, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्यासह इतरही काही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती.जिल्हाधिकाºयांनी सर्वात प्रथम दूषित पाणी असलेले प्याले बोलावले. ते पत्रकारांच्या हाती दिले व जादू बघा, असे म्हणाले. जिल्हाधिकाºयांचा आता हा कोणता नवा प्रयोग म्हणून सारेच उत्सुकतेने पाहत होते. तेवढयात त्यांनी एका कर्मचा?्याला, जादू घेऊन ये, असे सांगीतले. त्या व्यक्तिने एका टोपल्यामध्ये अर्धवट जळलेल्या अवस्थेत काडी कचरा आणला व पत्रकारांच्या समोर ठेवला. त्या धूरामुळे , हातातील प्याल्यातील दूषित पाण्यावर कोणता परिणाम होणार, याची उत्सुकता पत्रकारांना लागली होती; मात्र जिल्हाधिकाºयांनी दूषित पाण्याचे पेले व धुराचे टोपले घेऊन जाण्याचे फर्मान सोडले. तोपर्यंतही नेमके काय घडत आहे, ते पत्रकारांना कळले नाही. पत्रकारांनी विचारणा केली असता, थोडा धीर धरा असे म्हणत, सर्वांची उत्सुकता ताणुन धरली. त्यानंतर जिल्हाधिका?्यांनी संबोधनाला सुरवात केली. नव्या वर्षात नवे काय केले पाहिजे यावर आपण चर्चा करू, असे म्हणत त्यांनी सर्वच वर्तमानपत्रांचे गेल्या चार दिवसातील अंक बोलावले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या मनातील खरी मळमळ बाहेर पडली.मोर्णा महोत्सवाला एवढीच प्रसिद्धी का दिली, असा जाब विचारणे त्यांनी सुरू केले. एवढयावर ते थांबतील किंवा मोर्णा उत्सवाचा कंपू त्यांना थांबवेल, अशी अपेक्षा असलेल्या पत्रकारांनी सयंमाने आधी ऐकून घेण्याची भूमिका ठेवली; मात्र यशाची हवा डोक्यात गेलेल्या जिल्हाधिका?्यांनी, तुमच्या नोकºयांशी इमान बाळगा, त्या कधीही जाऊ शकतील, अशी भाषा वापरण्यास सुरवात केली. त्यानंतर मात्र सर्वच पत्रकारांचा संयम संपला आणि त्यांनी जिल्हाधिकाºयांना प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली.कोणत्याही मजकुराच्या प्रसिद्धीसंदभार्तील अंतिम निर्णय संपादकांचा आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे त्यांना उपस्थित पत्रकारांनी ठणकावून सांगितले.सर्व पत्रकारांनी एका सुरात जिल्हाधिकाºयांना धारेवर धरल्यानंतर मात्र, आपला अपमान करण्याचा उद्देश नसल्याचे सांगत त्यांनी क्षमायाचना सुरू केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार गजानन नारे, मधु जाधव, अशोक ढेरे व संजय खडसे हे मुक दर्शक बनुन पाहत होते. त्यानंतर सर्व पत्रकारांनी निषेध करीत बहिर्गमन केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी फेकले वर्तमानपत्राचे अंकमोर्णा महोत्सवाला एका स्थानिक वर्तमानपत्राने अजिबात प्रसिद्धी दिली नाही, जणू काही बहिष्कार घातला होता, त्या वर्तमानपत्राचे चारही दिवसाचे अंक ही तर रद्दी आहे, अशी उद्दाम भाषा वापरत जिल्हाधिका?्यांनी त्या वर्तमानपत्राचे अंक चक्क फेकून दिले.

प्रशासनाचा सहभाग नव्हता तर वकीलपत्र घेतले कशाला?मोर्णा महोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासकीय अधिकाºयांनी आपले वजन वापरून सहयोग राशी गोळा करण्यास सहकार्य केले. ही बाब संपूर्ण अकोला शहरात चचेर्ची होती. प्रत्यक्षात मात्र महोत्सव लोक सहभागातून साजरा झाल्याचे नाटक वठविण्यात आले. जर मोर्णा महोत्सव हा प्रशासनाचा उपक्रम नव्हता तो मोर्णा फाऊंडेशनचा उपक्रम होता, तर मग उत्सवाला अपेक्षित प्रसिद्धी न मिळाल्याबद्दल आयोजकांचे वकीलपत्र घेऊन जिल्हाधिकाºयांनी संपादक व पत्रकारांशी असा उद्दामपणा केला तरी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय