शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोला : अतिक्रमण विभागाच्या गलथान कारभाराला विभाग प्रमुख जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:34 IST

अकोला : अतिक्रमण विभागातील गलथान कारभाराला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले जबाबदार असून, त्यांच्या मनमानी व नियोजनशून्य कारभारामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे ताशेरे या विभागात कार्यरत कर्मचार्‍यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात ओढले आहेत.

ठळक मुद्देस्थायी समिती सभापतींना मानसेवी कर्मचार्‍यांचे पत्रविभाग प्रमुखांवर ओढले ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अतिक्रमण विभागातील गलथान कारभाराला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले जबाबदार असून, त्यांच्या मनमानी व नियोजनशून्य कारभारामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे ताशेरे या विभागात कार्यरत कर्मचार्‍यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात ओढले आहेत. मनपातील एक वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख इंगोले यांच्यामुळे मानसेवी कर्मचार्‍यांचे मनोबल ढासळत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय. शहरात अतिक्रमणाच्या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिकांना वैताग आला असून, रस्त्यावरून धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणाची समस्या दूर करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची असली तरी मनपातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी साधलेल्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे हा विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण विभागात अंदाधुंद कारभार माजला असून, अतिक्रमकांजवळून खुलेआम हप्तेखोरी केली जात असल्याची माहिती आहे. या विभागाच्या हप्तेखोरीमुळे अतिक्रमकांचे मनोबल उंचावले असून, मनपाच्या आवारभिंतीलगत व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमकांनी कब्जा केल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते असो वा प्रभागातील अंतर्गत अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकारी निश्‍चित करतात. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अतिक्रमण विभागाचे आहे. मागील काही दिवसांपासून अतिक्रमण विभागाला वारंवार सूचना केल्यावरही कारवाई होत नसल्याचा आरोप खुद्द नगरसेवकांकडूनच केला जात आहे. नगरसेवकांच्या भावना व अतिक्रमण विभागाची मुजोरी ध्यानात घेता स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी ३0 जानेवारी रोजीच्या सभेत अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्‍यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचे निर्देश दिले होते. तसेच विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महासभेत सादर करण्याचे बजावले होते. याप्रकरणी अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्‍यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात या विभागाचा गलथान कारभार व वाढलेल्या अतिक्रमणाला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांच्या कामकाजावर गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले आहेत. 

वरिष्ठ अधिकार्‍याकडून पाठराखण का?अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर थेट मनपा उपायुक्त (विकास) यांचे नियंत्रण राहते. आजरोजी अतिक्रमण विभागाने मनमानी कारभाराचा कळस गाठल्यामुळे शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी अतिक्रमण निर्माण झाले आहे. या विभागाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्याची जबाबदारी असणार्‍या मनपातील एका वरिष्ठ अधिकार्‍याकडूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती आहे.

मानसेवी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन अतिक्रमण हटविणे अपेक्षित असताना विभाग प्रमुख एकटेच मोहिमेवर निघतात. विभाग प्रमुखांच्या भूमिकेमुळे या विभागातील कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. कर्मचार्‍यांनी दिलेल्या पत्रात या सर्व बाबी नमूद केल्या आहेत. - बाळ टाले,सभापती, स्थायी समिती, मनपा

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका