शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकोला : अतिक्रमण विभागाच्या गलथान कारभाराला विभाग प्रमुख जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:34 IST

अकोला : अतिक्रमण विभागातील गलथान कारभाराला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले जबाबदार असून, त्यांच्या मनमानी व नियोजनशून्य कारभारामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे ताशेरे या विभागात कार्यरत कर्मचार्‍यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात ओढले आहेत.

ठळक मुद्देस्थायी समिती सभापतींना मानसेवी कर्मचार्‍यांचे पत्रविभाग प्रमुखांवर ओढले ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अतिक्रमण विभागातील गलथान कारभाराला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले जबाबदार असून, त्यांच्या मनमानी व नियोजनशून्य कारभारामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे ताशेरे या विभागात कार्यरत कर्मचार्‍यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात ओढले आहेत. मनपातील एक वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख इंगोले यांच्यामुळे मानसेवी कर्मचार्‍यांचे मनोबल ढासळत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय. शहरात अतिक्रमणाच्या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिकांना वैताग आला असून, रस्त्यावरून धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणाची समस्या दूर करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची असली तरी मनपातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी साधलेल्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे हा विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण विभागात अंदाधुंद कारभार माजला असून, अतिक्रमकांजवळून खुलेआम हप्तेखोरी केली जात असल्याची माहिती आहे. या विभागाच्या हप्तेखोरीमुळे अतिक्रमकांचे मनोबल उंचावले असून, मनपाच्या आवारभिंतीलगत व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमकांनी कब्जा केल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते असो वा प्रभागातील अंतर्गत अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकारी निश्‍चित करतात. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अतिक्रमण विभागाचे आहे. मागील काही दिवसांपासून अतिक्रमण विभागाला वारंवार सूचना केल्यावरही कारवाई होत नसल्याचा आरोप खुद्द नगरसेवकांकडूनच केला जात आहे. नगरसेवकांच्या भावना व अतिक्रमण विभागाची मुजोरी ध्यानात घेता स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी ३0 जानेवारी रोजीच्या सभेत अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्‍यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचे निर्देश दिले होते. तसेच विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महासभेत सादर करण्याचे बजावले होते. याप्रकरणी अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्‍यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात या विभागाचा गलथान कारभार व वाढलेल्या अतिक्रमणाला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांच्या कामकाजावर गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले आहेत. 

वरिष्ठ अधिकार्‍याकडून पाठराखण का?अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर थेट मनपा उपायुक्त (विकास) यांचे नियंत्रण राहते. आजरोजी अतिक्रमण विभागाने मनमानी कारभाराचा कळस गाठल्यामुळे शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी अतिक्रमण निर्माण झाले आहे. या विभागाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्याची जबाबदारी असणार्‍या मनपातील एका वरिष्ठ अधिकार्‍याकडूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती आहे.

मानसेवी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन अतिक्रमण हटविणे अपेक्षित असताना विभाग प्रमुख एकटेच मोहिमेवर निघतात. विभाग प्रमुखांच्या भूमिकेमुळे या विभागातील कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. कर्मचार्‍यांनी दिलेल्या पत्रात या सर्व बाबी नमूद केल्या आहेत. - बाळ टाले,सभापती, स्थायी समिती, मनपा

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका