शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अकोला : जप्त केलेली रक्कम परत करण्याचा न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:24 IST

अकोला : काळीपिवळी प्रवासी वाहनाने महानकडे जात असलेल्या किराणा व्यावसायिकांकडून ५ लाख २0 हजार रुपयांची रोकड लुटमार प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम चोरीचा आरोप असलेल्यांनाच परत देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने सोमवारी दिले. या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून, या संदर्भात पोलीस अधीक्षकांना न्यायालयाने लेखी पत्र दिल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देलुटमार प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम चोरीचा आरोप असलेल्यांनाच परत देण्याचा आदेशपोलिसांच्या तपासावर न्यायालयाने ओढले ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काळीपिवळी प्रवासी वाहनाने महानकडे जात असलेल्या किराणा व्यावसायिकांकडून ५ लाख २0 हजार रुपयांची रोकड लुटमार प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम चोरीचा आरोप असलेल्यांनाच परत देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने सोमवारी दिले. या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून, या संदर्भात पोलीस अधीक्षकांना न्यायालयाने लेखी पत्र दिल्याची माहिती आहे.महानचे किराणा व्यावसायिक शंकर माणिकराव सरोदे हे अकोल्याकडे काळीपिवळीने किराणा साहित्य खरेदीसाठी येत होते. महानपासून तीन किलोमीटर अंतरावर काही आरोपींनी २२ जुलै २0१५ रोजी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच लाख २0 हजार रुपयांची रक्कम पळविली होती. या प्रकरणी शंकर सरोदे यांनी बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक एस. जी. कोरचे यांनी तपास करीत शेख यासीन शेख निसार, सूरज जयंतीलाल मोखकर, रोशन रामनारायण बामन, सैयद अबरार सैयद अंसार, हमीद बी शेख निसार, शेख मेहबूब ऊर्फ दौला यांना अटक करून त्यांच्याजवळून ३ लाख ७५ हजार रुपये जप्त केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींविरोधातील गुन्हा सिद्ध झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपींकडून जप्त केलेली ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम त्यांनाच परत करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास प्रचंड घोळ घालणारा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तपासावर चांगलेच ताशेरे ओढले.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCourtन्यायालय