शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : व्हीआरडीएल लॅबवर कोरोना चाचणीचा ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:15 IST

- प्रवीण खेते अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, प्रशासनातर्फे चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संकलित नमुन्यांची ...

- प्रवीण खेतेअकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, प्रशासनातर्फे चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संकलित नमुन्यांची संख्या वाढली असून, दररोज क्षमतेच्या अडीच पट चाचण्या केल्या जात आहे. परिणामी व्हीआरडीएल लॅबवरील ताण वाढला असून, रुग्णांना अहवालासाठी पाच ते सात दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चाचण्यांवर भर दिला जात आहे. गत १५ दिवसात संकलित नमुन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्हीआरडीएल लॅबवर ताण वाढला आहे. व्हीआरडीएल लॅबची क्षमता दिवसाला २५० नमुने तपासणीची आहे; मात्र संकलित नमुन्यांची संख्या वाढल्याने दररोज क्षमतेच्या अडीच पट म्हणजेच सुमारे ८०० चाचण्या केल्या जात आहे. रात्रंदिवस नमुने चाचण्यांचे कार्य सुरू असूनही रुग्णांना चाचणीसाठी पाच ते सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातीलही नमुने तपासणीसाठी अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबमध्ये येत आहेत. परिणामी लॅबवरील ताण वाढला आहे.

दररोज तपासणीसाठी येताहेत १,८०० ते २,००० नमुनेशासकीय वैद्यकीय महाविद्यालायातील व्हीआरडीएल लॅबमध्ये दररोज १,८०० ते २,००० नमुने तपासणीसाठी येतात; मात्र लॅबची क्षमता दिवसाला केवळ २५० नमुने तपासणीची आहे; मात्र तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने चाचण्यांही क्षमतेपेक्षा जास्त केल्या जात आहेत. दररोज जवळपास ८०० चाचण्या केल्या जात आहे.

केवळ दहा कर्मचाऱ्यांवर भारजीएमसीतील व्हीआरडीएल लॅबचा कारभार केवळ दहा कर्मचारी हाकत आहेत. मागील सहा महिन्यांपासून हे कर्मचारी रात्रंदिवस कामकाज करत असून, एकही दिवस सुटी घेतली नसल्याची माहिती आहे. चाचण्यांचा ताण वाढला असताना मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे; मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास कर्मचाºयांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

तर बेफिकिरीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यताकोविड चाचणीचा अहवाल मिळण्यास पाच ते सात दिवसांचा कालावधी लागत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. तर दुसरीकडे नवीन नियमावलीनुसार, रुग्णांना दहा दिवसांऐवजी केवळ सात दिवस क्वारंटीन केले जात आहे. त्यानंतर त्याला १४ दिवसांचे होम क्वारंटीन केले जात आहे. अशा परिस्थितीत स्वॅब दिल्यानंतर सात दिवसांनी अहवाल मिळत असेल, तर रुग्णांकडून बेफिकिरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना चाचणीसाठी संकलित नमुन्यांची संख्या वाढली असून, व्हीआरडीएल लॅबवर त्याचा ताण वाढला आहे. किमान मनुष्यबळ असतानाही दररोज क्षमतेपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या