शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अकोला : व्हीआरडीएल लॅबवर कोरोना चाचणीचा ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:15 IST

- प्रवीण खेते अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, प्रशासनातर्फे चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संकलित नमुन्यांची ...

- प्रवीण खेतेअकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, प्रशासनातर्फे चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संकलित नमुन्यांची संख्या वाढली असून, दररोज क्षमतेच्या अडीच पट चाचण्या केल्या जात आहे. परिणामी व्हीआरडीएल लॅबवरील ताण वाढला असून, रुग्णांना अहवालासाठी पाच ते सात दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चाचण्यांवर भर दिला जात आहे. गत १५ दिवसात संकलित नमुन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्हीआरडीएल लॅबवर ताण वाढला आहे. व्हीआरडीएल लॅबची क्षमता दिवसाला २५० नमुने तपासणीची आहे; मात्र संकलित नमुन्यांची संख्या वाढल्याने दररोज क्षमतेच्या अडीच पट म्हणजेच सुमारे ८०० चाचण्या केल्या जात आहे. रात्रंदिवस नमुने चाचण्यांचे कार्य सुरू असूनही रुग्णांना चाचणीसाठी पाच ते सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातीलही नमुने तपासणीसाठी अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबमध्ये येत आहेत. परिणामी लॅबवरील ताण वाढला आहे.

दररोज तपासणीसाठी येताहेत १,८०० ते २,००० नमुनेशासकीय वैद्यकीय महाविद्यालायातील व्हीआरडीएल लॅबमध्ये दररोज १,८०० ते २,००० नमुने तपासणीसाठी येतात; मात्र लॅबची क्षमता दिवसाला केवळ २५० नमुने तपासणीची आहे; मात्र तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने चाचण्यांही क्षमतेपेक्षा जास्त केल्या जात आहेत. दररोज जवळपास ८०० चाचण्या केल्या जात आहे.

केवळ दहा कर्मचाऱ्यांवर भारजीएमसीतील व्हीआरडीएल लॅबचा कारभार केवळ दहा कर्मचारी हाकत आहेत. मागील सहा महिन्यांपासून हे कर्मचारी रात्रंदिवस कामकाज करत असून, एकही दिवस सुटी घेतली नसल्याची माहिती आहे. चाचण्यांचा ताण वाढला असताना मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे; मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास कर्मचाºयांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

तर बेफिकिरीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यताकोविड चाचणीचा अहवाल मिळण्यास पाच ते सात दिवसांचा कालावधी लागत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. तर दुसरीकडे नवीन नियमावलीनुसार, रुग्णांना दहा दिवसांऐवजी केवळ सात दिवस क्वारंटीन केले जात आहे. त्यानंतर त्याला १४ दिवसांचे होम क्वारंटीन केले जात आहे. अशा परिस्थितीत स्वॅब दिल्यानंतर सात दिवसांनी अहवाल मिळत असेल, तर रुग्णांकडून बेफिकिरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना चाचणीसाठी संकलित नमुन्यांची संख्या वाढली असून, व्हीआरडीएल लॅबवर त्याचा ताण वाढला आहे. किमान मनुष्यबळ असतानाही दररोज क्षमतेपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या