शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

अकोला : व्हीआरडीएल लॅबवर कोरोना चाचणीचा ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:15 IST

- प्रवीण खेते अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, प्रशासनातर्फे चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संकलित नमुन्यांची ...

- प्रवीण खेतेअकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, प्रशासनातर्फे चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संकलित नमुन्यांची संख्या वाढली असून, दररोज क्षमतेच्या अडीच पट चाचण्या केल्या जात आहे. परिणामी व्हीआरडीएल लॅबवरील ताण वाढला असून, रुग्णांना अहवालासाठी पाच ते सात दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चाचण्यांवर भर दिला जात आहे. गत १५ दिवसात संकलित नमुन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्हीआरडीएल लॅबवर ताण वाढला आहे. व्हीआरडीएल लॅबची क्षमता दिवसाला २५० नमुने तपासणीची आहे; मात्र संकलित नमुन्यांची संख्या वाढल्याने दररोज क्षमतेच्या अडीच पट म्हणजेच सुमारे ८०० चाचण्या केल्या जात आहे. रात्रंदिवस नमुने चाचण्यांचे कार्य सुरू असूनही रुग्णांना चाचणीसाठी पाच ते सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातीलही नमुने तपासणीसाठी अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबमध्ये येत आहेत. परिणामी लॅबवरील ताण वाढला आहे.

दररोज तपासणीसाठी येताहेत १,८०० ते २,००० नमुनेशासकीय वैद्यकीय महाविद्यालायातील व्हीआरडीएल लॅबमध्ये दररोज १,८०० ते २,००० नमुने तपासणीसाठी येतात; मात्र लॅबची क्षमता दिवसाला केवळ २५० नमुने तपासणीची आहे; मात्र तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने चाचण्यांही क्षमतेपेक्षा जास्त केल्या जात आहेत. दररोज जवळपास ८०० चाचण्या केल्या जात आहे.

केवळ दहा कर्मचाऱ्यांवर भारजीएमसीतील व्हीआरडीएल लॅबचा कारभार केवळ दहा कर्मचारी हाकत आहेत. मागील सहा महिन्यांपासून हे कर्मचारी रात्रंदिवस कामकाज करत असून, एकही दिवस सुटी घेतली नसल्याची माहिती आहे. चाचण्यांचा ताण वाढला असताना मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे; मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास कर्मचाºयांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

तर बेफिकिरीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यताकोविड चाचणीचा अहवाल मिळण्यास पाच ते सात दिवसांचा कालावधी लागत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. तर दुसरीकडे नवीन नियमावलीनुसार, रुग्णांना दहा दिवसांऐवजी केवळ सात दिवस क्वारंटीन केले जात आहे. त्यानंतर त्याला १४ दिवसांचे होम क्वारंटीन केले जात आहे. अशा परिस्थितीत स्वॅब दिल्यानंतर सात दिवसांनी अहवाल मिळत असेल, तर रुग्णांकडून बेफिकिरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना चाचणीसाठी संकलित नमुन्यांची संख्या वाढली असून, व्हीआरडीएल लॅबवर त्याचा ताण वाढला आहे. किमान मनुष्यबळ असतानाही दररोज क्षमतेपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या