शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अकोला: यंदाच्या कावड महोत्सवावर कोरोनाचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:00 IST

यंदा कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता, या महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- आशिष गावंडे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. येत्या २१ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असून, १७ आॅगस्ट रोजी शेवटचा श्रावण सोमवार आहे. यंदा कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता, या महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हित लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू तसेच जिल्हा प्रशासन कोणता निर्णय घेतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. श्रावण महिन्याला प्रारंभ होण्यापूर्वीच या महोत्सवात सहभागी होणाºया शिवभक्तांना कावडच्या तयारीचे वेध लागतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून चहा, नाश्ता, फराळ आदी व्यवस्था उभारतात. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातील भाविक अकोल्यात दाखल होत असतात. येत्या २१ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होणार असून, यंदा संसर्गजन्य कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता पालखी व कावडचे आयोजन करणाºया शिवभक्त मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी एकमेक ांच्या संपर्कात न येण्याची नियमावली असल्यामुळे कावड महोत्सवात हजारोंच्या संख्येने असलेले पालखी व कावडधारी शिवभक्त कसे एकत्र येणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थातच, देशावर आलेले कोरोनाचे संकट व मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू व जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतात, याकडे शिवभक्तांचे लक्ष लागले आहे.अकोलेकरांच्या हिताचा व्हावा विचार पावसाळ््यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शहरातील प्रमुख गणेश मंडळांसोबत संवाद साधत सार्वजनिक उत्सव छोटेखानी स्वरूपात आयोजित करण्याचे आवाहन केले होते. ही बाब पाहता पालकमंत्री ना.बच्चू कडू यांनीसुद्धा अकोलेकरांच्या हिताचा विचार करूनच ठोस निर्णय घ्यावा, असा सूर पालखी व कावडधारी शिवभक्तांमधून उमटू लागला आहे.

शिवभक्तांच्या नैतिक जबाबदारीत वाढकावड महोत्सवाचे आकर्षण असलेल्या सर्वात मोठ्या,आकर्षक व सामाजिक संदेश देणाऱ्यांमध्ये जुने शहरातील शिवभक्त मंडळांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने डाबकी रोडवासी मित्र मंडळ, जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळ, हरिहर शिवभक्त मंडळ, जय भवानी शिवभक्त मंडळांचा समावेश आहे. कावडमध्ये सहभागी होणाºया शिवभक्तांची संख्या व कोरोनाचे सावट पाहता यंदा शिवभक्त मंडळांच्या नैतिक जबाबदारीत वाढ झाल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सणIndian Traditionsभारतीय परंपराcorona virusकोरोना वायरस बातम्या