शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची चाचणी अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 11:22 IST

या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.

- संतोष येलकरअकोला: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची चाचणी शासनामार्फत घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येणाºया या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या राज्यातील शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येत असलेल्या या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.तालुकास्तरीय गठित होणार तक्रार निवारण समित्या!कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील जिल्हानिहाय कामाचा आढावा ७ फेबु्रवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेतला. कर्जमाफी संदर्भात शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण समित्या गठित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार कर्जमाफी संदर्भात शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अकोला जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्या गठित करण्यात येणार आहेत.कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी