शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची चाचणी अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 11:22 IST

या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.

- संतोष येलकरअकोला: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची चाचणी शासनामार्फत घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येणाºया या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या राज्यातील शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येत असलेल्या या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.तालुकास्तरीय गठित होणार तक्रार निवारण समित्या!कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील जिल्हानिहाय कामाचा आढावा ७ फेबु्रवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेतला. कर्जमाफी संदर्भात शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण समित्या गठित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार कर्जमाफी संदर्भात शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अकोला जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्या गठित करण्यात येणार आहेत.कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी