शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Akola: चिंताजनक! अकोला जिल्ह्यातील ९ महसूल मंडळांत २६ दिवसांपासून पाऊसच नाही

By रवी दामोदर | Updated: September 5, 2023 18:26 IST

Akola: पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या वाटेवर असून, शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९ महसूल मंडळात दि.२५ जुलै ते ५ सप्टेंबरपर्यंत अशा २६ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याचे वास्तव आहे.

- रवी दामोदर अकोला - पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या वाटेवर असून, शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९ महसूल मंडळात दि.२५ जुलै ते ५ सप्टेंबरपर्यंत अशा २६ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याचे वास्तव आहे. त्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषित करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जिल्ह्याचे तापमान ३५.६ अंशांवर गेले असल्याने पिके करपणे सुरू झाली आहेत. त्यामुळे बहरलेल्या पिकाची वाटचाल आता दुष्काळाकडे चालली असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंतेचे ढग दाटले आहेत. यंदाच्या खरिपात जिल्ह्यात ४.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६१ टक्के पाऊस बरसला असून, तब्बल ३९ टक्के पावसाची तूट आहे.

तापमान ३६.२ अंशांवर, पिके करपण्यास सुरुवातजुलै महिन्यात व ऑगस्ट महिन्यात पावसाचा प्रदीर्घ खंड राहिला आहे. पावसाचा खंड असल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यात सप्टेंबर महिन्याला सुरुवात होताच तापमानातही वाढ झाली असून, पिकांनी माना टाकल्या आहेत. काही भागांत पिके करपण्यास सुरुवात झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ३६.२ अंशांवर असून, दुपारच्या सुमारास जिवाची लाही-लाही झाली.

टॅग्स :Akolaअकोलाweatherहवामानmonsoonमोसमी पाऊस