शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

२३३ धाेकादायक इमारतीत ११५६ रहिवासी; मरण्याची हाैस नाही, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 10:39 IST

Akola News : वडिलाेपार्जित संपत्तीत हक्काचा हिस्सा मिळावा, या उद्देशातून बहुतांश रहिवासी इमारत खाली करीत नसल्याची माहिती आहे.

अकाेला : शहरातील २३३ शिकस्त व जीर्ण इमारतींमधील सुमारे ११५६ रहिवाशांच्या जीविताला धाेका आहे. पावसाळ्यात अशा धाेकादायक इमारती काेसळण्याची दाट शक्यता लक्षात घेता महापालिका प्रशासनाने संबंधितांना नाेटिसा बजावून औपचारिकता निभावली असली तरी इमारतींमधील रहिवासीदेखील नानाविध अडचणींचा सामना करीत असल्याचे चित्र आहे. वडिलाेपार्जित संपत्तीत हक्काचा हिस्सा मिळावा, या उद्देशातून बहुतांश रहिवासी इमारत खाली करीत नसल्याची माहिती आहे. यामुळे परिसरातील इतरही रहिवाशांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे.

महापालिका क्षेत्रात धाेकादायक व शिकस्त इमारतींची माेठी संख्या आहे. अशा इमारतींचे मनपाच्या नगररचना विभागाकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. तसेच इमारतींमधील मालमत्ताधारकांना नाेटिसा बजावून औपचारिकता निभावली जाते. नाेटीस प्राप्त झाल्यानंतरही मालमत्ताधारक इमारत साेडत नाहीत. अनेकांचे वडिलाेपार्जित हक्क, दावे-प्रतिदावे असून न्यायालयात सदर प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यातील काही इमारतींमध्ये मागील ४० ते ५० वर्षांपासून ठाण मांडलेल्या भाडेकरूंनीही हक्क दाखल केले आहेत. अर्थात, या सर्व कारणांमुळे मरणाची टांगती तलवार असूनही नाइलाजाने मालमत्ताधारकांचा शिकस्त व जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये मुक्काम आहे.

 

झाेननिहाय शिकस्त इमारती

पूर्व झाेन - ६८

पश्चिम झाेन - ९५

उत्तर झाेन - ७०

 

दक्षिण झाेनमध्ये सर्वे सुरूच!

पावसाळा ताेंडावर आल्यानंतरही दक्षिण झाेनमधील शिकस्त इमारतींचा सर्वे सुरूच असल्याची माहिती आहे. दरम्यान, उर्वरित तीनही झाेनमधील धाेकादायक इमारतींमधील रहिवाशांना नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

सारे काही कळते, पण कुठे जाणार?

इमारत शिकस्त असली तरी आमच्या संपत्तीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हक्काच्या लढाईसाठी जीव धाेक्यात घालून या ठिकाणी राहत आहे.

- युसूफ शेख

 

वडिलांच्या संपत्तीत सामायिक हिस्सेदारी आहे. परंतु आपसात बेबनाव असल्याने काेणीही इमारत खाली करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नाइलाजाने या ठिकाणी राहत आहे.

- दिनेश भट्टड

 

या इमारतीमध्ये भाडेतत्वानुसार आमच्या दाेन पिढ्यांचे वास्तव्य गेले. आता तीसरी पिढी राहत आहे. आम्ही घर साेडल्यास जायचे काेठे, असा सवाल आहे.

- प्रवीण मिश्रा

 

वारंवार दिल्या नाेटिसा

शहरात सर्वाधिक धाेकादायक इमारती पश्चिम झाेन व त्यापाठाेपाठ उत्तर झाेनमध्ये आहेत. आम्ही रहिवाशांना नाेटिसा दिल्यानंतरही ते इमारत साेडत नसल्याची माहिती झाेन अधिकारी राजेंद्र टापरे यांनी दिली.

 

इमारत पडल्यास जबाबदार काेण?

पावसाळ्यात धाेकादायक इमारती काेसळण्याची शक्यता राहते. अशा इमारती उभ्या असल्यामुळे परिसरातील इतर रहिवाशांच्या जीवितालाही धाेका निर्माण झाला आहे. मनपाने नाेटिसा देऊन औपचारिकता निभावली असली तरी इमारत पडल्यास जबाबदार काेण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका