शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

२३३ धाेकादायक इमारतीत ११५६ रहिवासी; मरण्याची हाैस नाही, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 10:39 IST

Akola News : वडिलाेपार्जित संपत्तीत हक्काचा हिस्सा मिळावा, या उद्देशातून बहुतांश रहिवासी इमारत खाली करीत नसल्याची माहिती आहे.

अकाेला : शहरातील २३३ शिकस्त व जीर्ण इमारतींमधील सुमारे ११५६ रहिवाशांच्या जीविताला धाेका आहे. पावसाळ्यात अशा धाेकादायक इमारती काेसळण्याची दाट शक्यता लक्षात घेता महापालिका प्रशासनाने संबंधितांना नाेटिसा बजावून औपचारिकता निभावली असली तरी इमारतींमधील रहिवासीदेखील नानाविध अडचणींचा सामना करीत असल्याचे चित्र आहे. वडिलाेपार्जित संपत्तीत हक्काचा हिस्सा मिळावा, या उद्देशातून बहुतांश रहिवासी इमारत खाली करीत नसल्याची माहिती आहे. यामुळे परिसरातील इतरही रहिवाशांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे.

महापालिका क्षेत्रात धाेकादायक व शिकस्त इमारतींची माेठी संख्या आहे. अशा इमारतींचे मनपाच्या नगररचना विभागाकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. तसेच इमारतींमधील मालमत्ताधारकांना नाेटिसा बजावून औपचारिकता निभावली जाते. नाेटीस प्राप्त झाल्यानंतरही मालमत्ताधारक इमारत साेडत नाहीत. अनेकांचे वडिलाेपार्जित हक्क, दावे-प्रतिदावे असून न्यायालयात सदर प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यातील काही इमारतींमध्ये मागील ४० ते ५० वर्षांपासून ठाण मांडलेल्या भाडेकरूंनीही हक्क दाखल केले आहेत. अर्थात, या सर्व कारणांमुळे मरणाची टांगती तलवार असूनही नाइलाजाने मालमत्ताधारकांचा शिकस्त व जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये मुक्काम आहे.

 

झाेननिहाय शिकस्त इमारती

पूर्व झाेन - ६८

पश्चिम झाेन - ९५

उत्तर झाेन - ७०

 

दक्षिण झाेनमध्ये सर्वे सुरूच!

पावसाळा ताेंडावर आल्यानंतरही दक्षिण झाेनमधील शिकस्त इमारतींचा सर्वे सुरूच असल्याची माहिती आहे. दरम्यान, उर्वरित तीनही झाेनमधील धाेकादायक इमारतींमधील रहिवाशांना नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

सारे काही कळते, पण कुठे जाणार?

इमारत शिकस्त असली तरी आमच्या संपत्तीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हक्काच्या लढाईसाठी जीव धाेक्यात घालून या ठिकाणी राहत आहे.

- युसूफ शेख

 

वडिलांच्या संपत्तीत सामायिक हिस्सेदारी आहे. परंतु आपसात बेबनाव असल्याने काेणीही इमारत खाली करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नाइलाजाने या ठिकाणी राहत आहे.

- दिनेश भट्टड

 

या इमारतीमध्ये भाडेतत्वानुसार आमच्या दाेन पिढ्यांचे वास्तव्य गेले. आता तीसरी पिढी राहत आहे. आम्ही घर साेडल्यास जायचे काेठे, असा सवाल आहे.

- प्रवीण मिश्रा

 

वारंवार दिल्या नाेटिसा

शहरात सर्वाधिक धाेकादायक इमारती पश्चिम झाेन व त्यापाठाेपाठ उत्तर झाेनमध्ये आहेत. आम्ही रहिवाशांना नाेटिसा दिल्यानंतरही ते इमारत साेडत नसल्याची माहिती झाेन अधिकारी राजेंद्र टापरे यांनी दिली.

 

इमारत पडल्यास जबाबदार काेण?

पावसाळ्यात धाेकादायक इमारती काेसळण्याची शक्यता राहते. अशा इमारती उभ्या असल्यामुळे परिसरातील इतर रहिवाशांच्या जीवितालाही धाेका निर्माण झाला आहे. मनपाने नाेटिसा देऊन औपचारिकता निभावली असली तरी इमारत पडल्यास जबाबदार काेण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका