शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

अकोला : अपघातात चार दिवसांत ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:31 IST

अकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार  तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे  धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून,  यामध्ये ११ च्यावर वाहनचालक व प्रवासी ठार झाले आहेत.

ठळक मुद्देरस्त्यांनी घेतला बळीप्रशासनाला जाग येईना

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार  तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे  धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून,  यामध्ये ११ च्यावर वाहनचालक व प्रवासी ठार झाले आहेत.अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गत दोन दिवसांत झालेल्या अपघातात सात जण ठार  झाले आहेत, तर पातूर घाटात रविवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे.  यासोबतच विटांच्या मिनी ट्रकखाली येऊन एक जण जागेवरच ठार झाल्याची घटना चोहोट्टा बाजार  परिसरात शनिवारी घडली. सोमवारी दुपारी शिवणी विमानतळाजवळ झालेल्या अपघातात तीन जण  ठार झाले असून, बडनेराजवळील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघातात नागपुरा तील चार जण जागेवरच ठार झाले आहेत. बोरगाव मंजूजवळ आल्टो कार व टँकरच्या अपघातात  नागपूर जिल्हय़ातील कन्हान येथील दोघे जण जागेवरच ठार झाले होते. अशा प्रकारे गत चार  दिवसांमध्ये चाहोट्टा बाजार, पातूर घाट, बोरगाव मंजू, लोणी व शिवणी विमानतळाजवळ झालेल्या  अपघातात ११ जण ठार झाले असून, पाचच्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी  रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत.

रस्त्याच्या चाळणीमुळे अपघात वाढले!रस्त्यावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे अपघाताचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्याची माहिती  समोर आली आहे. अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांत झालेले अपघात हे  केवळ रस्त्यावरील खड्डय़ांमुळे झाल्याचे वास्तव आहे. तसेच चोहोट्टा बाजार येथील अपघातही रस् त्यावरील खड्डे वाचविताना झाल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. यासोबतच पातूर घाटातील अपघा तालाही रस्त्यावरील खड्डेच जबाबदार असल्याने सार्वजनिक बांधकाम खाते व राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळेच या ११ जणांचा बळी गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम वभागाचे दावे फोलसार्वजनिक बांधकाम विभागाने १५ डिसेंबरपूर्वी राज्यातील पूर्ण रस्त्यांवरील खड्डे बुजविणार  असल्याच्या घोषणा मोठा गाजावाजा करून करण्यात आल्या होत्या; मात्र अकोला जिल्हय़ातील  परिस्थिती विदारक असून, एकाही रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात आला नसून, उलट १५  डिसेंबरनंतर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ११ जणांच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग  व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असून, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची मागणी होत  आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAkola cityअकोला शहरAccidentअपघात