शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

अकोला : अपघातात चार दिवसांत ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:31 IST

अकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार  तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे  धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून,  यामध्ये ११ च्यावर वाहनचालक व प्रवासी ठार झाले आहेत.

ठळक मुद्देरस्त्यांनी घेतला बळीप्रशासनाला जाग येईना

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार  तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे  धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून,  यामध्ये ११ च्यावर वाहनचालक व प्रवासी ठार झाले आहेत.अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गत दोन दिवसांत झालेल्या अपघातात सात जण ठार  झाले आहेत, तर पातूर घाटात रविवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे.  यासोबतच विटांच्या मिनी ट्रकखाली येऊन एक जण जागेवरच ठार झाल्याची घटना चोहोट्टा बाजार  परिसरात शनिवारी घडली. सोमवारी दुपारी शिवणी विमानतळाजवळ झालेल्या अपघातात तीन जण  ठार झाले असून, बडनेराजवळील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघातात नागपुरा तील चार जण जागेवरच ठार झाले आहेत. बोरगाव मंजूजवळ आल्टो कार व टँकरच्या अपघातात  नागपूर जिल्हय़ातील कन्हान येथील दोघे जण जागेवरच ठार झाले होते. अशा प्रकारे गत चार  दिवसांमध्ये चाहोट्टा बाजार, पातूर घाट, बोरगाव मंजू, लोणी व शिवणी विमानतळाजवळ झालेल्या  अपघातात ११ जण ठार झाले असून, पाचच्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी  रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत.

रस्त्याच्या चाळणीमुळे अपघात वाढले!रस्त्यावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे अपघाताचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्याची माहिती  समोर आली आहे. अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांत झालेले अपघात हे  केवळ रस्त्यावरील खड्डय़ांमुळे झाल्याचे वास्तव आहे. तसेच चोहोट्टा बाजार येथील अपघातही रस् त्यावरील खड्डे वाचविताना झाल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. यासोबतच पातूर घाटातील अपघा तालाही रस्त्यावरील खड्डेच जबाबदार असल्याने सार्वजनिक बांधकाम खाते व राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळेच या ११ जणांचा बळी गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम वभागाचे दावे फोलसार्वजनिक बांधकाम विभागाने १५ डिसेंबरपूर्वी राज्यातील पूर्ण रस्त्यांवरील खड्डे बुजविणार  असल्याच्या घोषणा मोठा गाजावाजा करून करण्यात आल्या होत्या; मात्र अकोला जिल्हय़ातील  परिस्थिती विदारक असून, एकाही रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात आला नसून, उलट १५  डिसेंबरनंतर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ११ जणांच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग  व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असून, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची मागणी होत  आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAkola cityअकोला शहरAccidentअपघात