शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दहा महिन्यांपासून ‘एमआयडीसी’चे विभागीय अधिकारी पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:05 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अमरावती विभागाचे प्रमुख अधिकारी पद गेल्या आॅगस्ट महिन्यांपासून रिक्त आहे.

ठळक मुद्देअमरावतीपेक्षा जास्त महसूल असूनही गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यातील आरओ कार्यालयाची मागणी पूर्ण झालेली नाही. अमरावतीसह अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील उद्योजकांची अनेक विकासांची कामे रेंगाळली आहेत. उद्योगमंत्री देसाईंसह लोकप्रतिनिधींचेही लक्ष उद्योजकांच्या तक्रारींकडे नसल्याने शासनाप्रती रोष व्यक्त होत आहे.

- संजय खांडेकर

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अमरावती विभागाचे प्रमुख अधिकारी पद गेल्या आॅगस्ट महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे अमरावतीसह अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील उद्योजकांची अनेक विकासांची कामे रेंगाळली आहेत. एकीकडे शासन ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’च्या घोषणा करीत असून, दुसरीकडे मात्र दहा-दहा महिने पूर्णवेळ अधिकारीदेखील मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये शासनाविरुद्ध प्रचंड असंतोष खदखदत आहे.अमरावती विभागात सर्वात जास्त महसूल देणाºयांमध्ये अकोला एमआयडीसीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अमरावतीपेक्षा जास्त महसूल असूनही गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यातील आरओ कार्यालयाची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेकडो उद्योजकांना अमरावतीऐवजी थेट नागपूर गाठावे लागत आहे. अकोला एमआयडीसीत मध्यंतरी फुडएक्स्पो पार पडले. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी राज्यमंत्री देसाई यांच्यासमोर अकोल्यातील उद्योजकांनी पाणी प्रश्नापासून तर आरओ कार्यालयातील अडचणींवर लक्ष वेधले होते. तेंव्हा देसाई यांनी अमरावतीला तातडीने अधिकारी देण्याची आणि प्रत्येक आठवड्यातून एक दिवस हे अधिकारी अकोल्यात मुक्कामी राहणार असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा मात्र पूर्णत: हवेत विरली आहे. अमरावती विभागाला पूर्णवेळ अधिकारी तर मिळालाच नाही, उलटपक्षी संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यांतील उद्योजकांना आता प्रत्येक बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी नागपूर गाठावे लागत आहे.अकोल्याच्या एमआयडीसीतील आॅनलाइन प्लॉट वितरण प्रणालीत घोटाळा झाल्याच्या तक्रारी मुंबईपर्यंत गाजल्या असूनही उद्योगमंत्री अकोल्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. प्लॉट मिळण्यासाठी लांबलचक यादी तयार असून, उद्योजक त्रस्त आहेत. उद्योगमंत्री देसाईंसह लोकप्रतिनिधींचेही लक्ष उद्योजकांच्या तक्रारींकडे नसल्याने शासनाप्रती रोष व्यक्त होत आहे.-राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अमरावती येथील आरओचे रिक्त पद तातडीने भरण्याचे सांगितले होते. ही प्रक्रिया प्रशासकीय बाबींवर सुरू आहे. गेल्या दहा महिन्यांपासून विदर्भातील ११ जिल्ह्यांचा प्रभार माझ्याकडे आहे.-संगीतराव, विभागीय अधिकारी एमआयडीसी, नागपूर.- दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नसल्याने उद्योगमंत्री देसाई यांना स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. त्यात आरओ कार्यालयातील अधिकारी आणि उद्योजकांना होत असलेल्या त्रासाबाबतही अवगत करण्यात आले आहे.-कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, एमआयडीसी, इंडस्ट्रिज असो. अकोला

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ