शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीच्या मुद्द्यावर अकोलेकरांची दिशाभूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 07:40 IST

शहराच्या विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त निधीत मॅचिंग फंड जमा करावा लागतो. मनपा कर्मचार्‍यांचे थकीत वेतन, पाणी पुरवठय़ासह शहरातील विद्युत व्यवस्थेचे देयक अदा करण्यासह शासनाचा उपकर जमा करण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे.

अकोला : शहराच्या विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त निधीत मॅचिंग फंड जमा करावा लागतो. मनपा कर्मचार्‍यांचे थकीत वेतन, पाणी पुरवठय़ासह शहरातील विद्युत व्यवस्थेचे देयक अदा करण्यासह शासनाचा उपकर जमा करण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. मागील अठरा वर्षांपासून मालमत्ता कराच्या रकमेत वाढ झाली नसल्यामुळे करवाढीचा निर्णय घ्यावा लागला. ही करवाढ नियमानुसारच असून, विरोधी पक्षांकडून अकोलेकरांची सपशेल दिशाभूल केली जात असल्याचे सांगत महापौर विजय अग्रवाल यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.शहरातील विकास कामांसाठी काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात किती निधी आणला व त्यातून कोणती विकास कामे केली, याची सुज्ञ अकोलेकरांचा जाण आहे. आजरोजी भाजपाच्या कार्यकाळात शहरात विविध योजनांच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांची कामे निकाली निघत आहेत. मागील अठरा वर्षांपासून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न झाल्यामुळे मनपा प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.आजपर्यंत शहरातील ७४ हजार मालमत्ताधारकांकडून केवळ १६ कोटींचा कर वसूल होत होता. मालमत्तांचा जीआयएसद्वारे सर्व्हे केल्यानंतर मालमत्तांची संख्या १ लाख ५२ हजार झाली असून, ही वसुली आता ५८ कोटींच्या वर जाणार आहे. यामध्ये हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागांचा समावेश नसल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अर्थातच, शासनाकडून प्राप्त निधीत मॅचिंग फंड टाकणे प्रशासनाला शक्य होऊन त्याद्वारे शहरातील विकास कामांची गती वाढणार आहे. अकोलेकरांवर केवळ करवाढ लादणे हा आमचा उद्देश नाही. १८ वर्षांपासून कोणतीही करवाढ झाली नाही, याचे सर्वच राजकीय पक्षांनी भान ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंकडे विरोध करण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्यामुळे करवाढीच्या मुद्यावरून अकोलेकरांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप महापौर विजय अग्रवाल यांनी केला. विरोधकांच्या राजकीय स्टंटबाजीला बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, गटनेता राहुल देशमुख, विलास शेळके आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांकडे उत्तर सादर करू!विभागीय आयुक्त, अमरावती यांनी तेरा पानांचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. कराच्या दरात वाढ करण्याचे मनपाला सर्वाधिकार आहेत. सर्व्हेसाठी कंपनीची नियुक्ती असो वा नागरिकांचे आक्षेप निकाली काढण्याची प्रक्रिया नियमानुसारच पार पडली आहे. या सर्व बाबींचा खुलासा मुख्यमंत्र्यांकडे पार पडणार्‍या सुनावणीदरम्यान केला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.निवडणुकीसाठी करवाढीचा आधार!करवाढीच्या मुद्यावर काँग्रेसने शिवसेना, राकाँ व भारिपसोबत अभद्र युती केली असून, ती किती काळ टिकते, हे लवकरच दिसून येईल. काँग्रेसचे पदाधिकारी व काही नगरसेवक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. मतदारसंघाच्या बांधणीसाठी करवाढीचा आधार घेतला जात असून, त्यासाठी नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले.सभागृहात स्वाक्षरी का नाहीत?आज रोजी करवाढीला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राकाँ व भारिप-बमसंमधील एकूण ३0 नगरसेवकांनी स्वाक्षरी केल्याचे समोर आले. त्यापूर्वी करवाढीच्या मुद्यावर दोन वेळा सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सभागृहात १४ नगरसेवकांनी करवाढीला विरोध दर्शवण्यासाठी स्वाक्षरीच केल्या नव्हत्या, तर शिवसेनेने तटस्थेची भूमिका घेतली होती. सभागृहात अधिकारांचा वापर न करणारे नगरसेवक आता करवाढीला विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत असल्याचा आरोप महापौर विजय अग्रवाल यांनी केला.