शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

कारागृहात स्थानबद्धतेचा अकाेला पॅटर्न अमरावती परिक्षेत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

अकाेला : कुख्यात गुंड तसेच अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी अकाेला पाेलिसांनी गत एका वर्षापासून राबविलेला एमपीडीए कारागृहात स्थानबद्ध ...

अकाेला : कुख्यात गुंड तसेच अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी अकाेला पाेलिसांनी गत एका वर्षापासून राबविलेला एमपीडीए कारागृहात स्थानबद्ध करण्याचा पॅटर्न आता अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहीती आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकीशाेर मीना यांनी तशा सूचना संबंधित पाेलीस अधीक्षकांना दिल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षापासून अवैधरीत्या प्रतिबंध असलेला गाैरखधंदा चालविणाऱ्यांना वारंवार समजपत्र तसेच प्रतिबंधात्मक कारवाया अकाेला पाेलिसांनी त्यांच्यावर केल्या. मात्र या कारवायांना न जुमानता अनेकजन गाैरखधंदा सुरूच ठेवत असल्याने त्यांचे कंबरडे माेडण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एमपीडीए कारवाईचा सपाटा सुरू केला. यासाेबतच गुंडगिरी व खंडणी वसूल करणाऱ्यांवरही अशाच प्रकारे कारवाई करून या गुंडांना पळता भुई थाेडी केली. याचेच परिणाम म्हणूण जिल्ह्यातील अवैध धंद्याना ब्रेक लागले आहेत, तर गुंडगिरीचाही बऱ्याच प्रमाणात नायनाट झाल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ३१ पेक्षा अधिक टाेळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर २९ पेक्षा अधिक जनांवर एमपीडीए कारवाई करून या आराेपींना मध्यवर्ती कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांनी एका आठवड्यापूर्वी अकाेल्यात गुन्हे आढावा बैठक घेतली. त्यानंतर याच बैठकीत अकाेला पाेलिसांच्या एमपीडीए कारवाईचे काैतुक करीत हा पॅटर्न अमरावती परिक्षेत्रात राबविण्याच्या सूचना विशेष पाेलीस महानिरीक्षक मीना यांनी केल्या आहेत. त्यामुळे अकाेला पॅटर्ननुसार पाच जिल्ह्यात कारवायांना प्रारंभ झाल्याची माहिती आहे.

अकाेला राज्यात टाॅपवर

पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकाेल्यातील गुन्हेगारीचा बिमाेड करण्यासाठी पदभार स्वीकारताच कुख्यात गुंडावर एमपीडीए कारवाईचे अस्त्र उगारले. त्यामुळे अनेक कुख्यात टोळ्यांना जेरबंद करण्यात आले असून, काही टाेळ्यांना दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या कारवायांमुळे अकाेला पाेलीस राज्यात टाॅपवर आहेत.

गुंडाचा मुक्काम अकाेल्याबाहेर

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना १० महिन्यांपूर्वी रुजू झाले. त्यापूर्वी काही दिवसाआधीच अकाेला पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारला. मीना यांचा अकाेल्यातील गुंडांवर असलेला वचक आणि जी. श्रीधर यांनी केलेल्या कारवायांमुळे अकाेल्यातील बहुतांश गुंडांनी त्यांचे बस्तान अकाेल्याच्याबाहेर हलविल्याची माहिती आहे.