शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

हगणदरीमुक्त शहरांना पुन्हा शाैचालये बांधण्याचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 11:38 IST

Swachh Bharat Abhiyan : नागरिकांसाठी वैयक्तिक शाैचालय उभारून देण्याचे निर्देश शासनाने महापालिकांना जारी केले आहेत.

अकाेला: केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानच्या धर्तीवर राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान राबविले जात आहे. राज्यातील अनेक शहरांना हगणदरीमुक्त दर्जा मिळाला असून, यामध्ये सातत्य राखण्यासाठी पुन्हा एकदा नागरिकांसाठी वैयक्तिक शाैचालय उभारून देण्याचे निर्देश शासनाने महापालिकांना जारी केले आहेत.

‘स्वच्छ भारत’ अभियानच्या पहिल्या टप्प्यात घरी वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. यामध्ये शौचालय बांधून देण्यासाठी केंद्र शासनाकडून ८ हजार रुपये तसेच राज्य शासनाकडून ४ हजार रुपये अनुदान मिळाले होते. त्यानुषंगाने राज्यातील महापालिका, नगर परिषदांनी स्वच्छता व आरोग्य विभागाच्या माध्यमातून शाैचालयांची उभारणी केली. २०१७ मध्ये राज्य शासनाने हगणदरीमुक्तीचा पुरस्कार जाहीर केला हाेता. तूर्तास हगणदरीमुक्तीचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ‘ओडीएफ प्लस’चे नामांकन मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यानुषंगाने शासनाने आता पुन्हा एकदा नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे निर्देश महापालिकांना जारी केले आहेत.

 

‘जिओ टॅगिंग’करावेच लागेल!

शहरात सार्वजनिक शौचालयांचा वापर करणाऱ्या नागरिकांना घरी वैयक्तिक शौचालय बांधायचे असल्यास लाभार्थीने मालमत्ता कर जमा करणे बंधनकारक आहे. तसेच अर्ज सादर करताना ज्या जागेवर शौचालय बांधायचे आहे त्या जागेचे जिओ-टॅगिंग केलेले छायाचित्र लावणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका