शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत शेती विकासात कृषी विज्ञान केंद्रांचे योगदान

By admin | Updated: May 19, 2014 20:06 IST

कृषी विज्ञान केंद्राच्या कृती आराखडा कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ दाणी यांचे प्रतिपादन.

अकोला : बदलत्या जागतिक आव्हानाचा सामना करताना विदर्भातील शेती व शेतकरी समृद्ध व त्यांच्यामध्ये ती क्षमता निर्माण करण्याचे काम करावे लागणार असून, कृषी विज्ञान केेंद्राचे शाश्वत शेती व कोरडवाहू तंत्रज्ञानाला भक्कम योगदान असले तरी, या तंत्रज्ञानचा प्रभाव या विज्ञान केंद्रांनी पडताळून पाहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. रविप्रकाश दाणी यांनी सोमवारी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत विदर्भातील अकराही जिल्ह्यात कार्यरत कृषी विज्ञान केंद्राच्या कृती आराखडा कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी त्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी डॉ. दाणी बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र विभागीय प्रकल्प संचालक डॉ. एन. सुधाकर, संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले, शिक्षण विस्तार संचालक डॉ. विजय माहोरकर, डॉ. व्ही.एम. भाले, डॉ. सी.एन. गांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. दाणी यांनी, कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार जिल्हापातळीवर करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पुरविली जात असल्याचे सांगितले. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात शेतकर्‍यांच्या शेेती करण्याच्या पद्धतीत तंत्रज्ञानाला अनुकूल बदल बघायला मिळत आहेत. शेतकर्‍यांना व्यावसायभिमुख करण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. डॉ. सुधाकर यांनी विदर्भाच्या शेती विकासात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीचे नव तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविले जात आहे. त्यामुळे येणार्‍या काही वर्षात विदर्भातील शेती अधिक समृद्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी आम्ही सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या कार्यशाळेला उपस्थित विदर्भातील १३ कृषी विज्ञान केंद्र्राच्या कार्यक्रम समन्वयकांनी कृषी विज्ञान केंद्राचा गतवर्षीच्या कामकाजाचा आढावा व यावर्षीचे नियोजन सादर केले.