शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

कृषी क्रांतीवरच देशाची महासत्तेकडे वाटचाल - विकास आमटे

By admin | Updated: January 24, 2017 02:43 IST

कृषी महाविद्यालयाच्या ५७ व्या ‘वीर झंकार’ स्नेहसंमेलाचे उद्घाटन.

अकोला, दि. २३- कृषिप्रधान देशात कृषी शिक्षणाने गगनभरारी घेतली असून, नवे तंत्रज्ञान, संशोधन शेतकर्‍यांच्या आर्थिक, सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कृषी क्रांतीचा हाच टप्पा देशाला महासत्तेकडे नेणारा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, आनंदवन महारोगी सेवा समितीचे डॉ. विकास आमटे यांनी सोमवारी केले. - ५डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाद्वारे आयोजित ५७ व्या वार्षिक स्नेहसंमेलन ह्यवीर झंकारह्णच्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर नीलिमा दाणी, अधिष्ठाता कृषी डॉ. व्ही. एम. भाले, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय डॉ. एस. एस. माने, डॉ. पी. बी. उमाळे, डॉ. व्ही. एल. गावंडे, यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी राहुल तायडे, स्नेहा मुसळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. आमटे म्हणाले खरा भारत खेड्यात असून, कृषी क्रांतीत शेतकर्‍यांचा वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. कृषिरत्न स्व. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्वप्नातील देश घडविण्यात कृषी शिक्षणाचा वाटा नोंद घेण्याजोगा आहे. कृषी क्षेत्रात युवकांचा वाढता कलही महत्त्वाचा आहे. कारण युवा शक्तीच्या बळावरच हा देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात डॉ. आमटे यांनी कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या योगदानावर प्रकाश टाकला. आनंदवन हे खर्‍या अर्थाने समजून घेणे गरजेचे आहे. त्यांनी आनंदवनाचे सचित्र व्याख्यानातून विद्यार्थ्यांसमोर उभे करू न समाजाप्रती आपल्या कर्तव्याची अनेक वास्तविक रूपे यावेळी तरुण विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध होत श्रावण केली. बाबा आमटे यांनी आपल्या आयुष्याचे सर्वस्व रुग्णसेवेला सर्मपित केले. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा समाजसेवेचा वसा सर्मथपणे पेलत महारोगी, दिव्यांग, समाजाने नाकारलेल्यांची सेवा करण्याचे व्रत स्वीकारले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. इतका प्रचंड त्याग, सर्मपण जे आमटे कुटुंबाने या देशाला दिले त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य असल्याचे भावनिक प्रतिपादन डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले. प्रास्ताविक राहुल तायडे व स्नेहा मुसळे यांनी केले. सूत्रसंचालन धम्मदीप आठवले, अंकिता गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनीषा यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तीन दिवस चालणार्‍या या उत्सवात सर्व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.