शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

कृषीपंप वीज जोडणीचे उद्दिष्ट अध्र्यावर!

By admin | Updated: June 12, 2015 01:59 IST

२.२ लाखापैकी १.१५ लाख कृषीपंपांना वीज जोडणी.

संतोष वानखडे / वाशिम : हिरवे स्वप्न साकारण्यासाठी नानाविध प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांना वीज वितरण कंपनीकडून ह्यशॉकह्ण बसत असल्याचे वास्तव समोर येत आहे. २0१३-१४ या वर्षात राज्यात २.२ लाख कृषीपंप विद्युतीकरणाचे उद्दिष्ट असताना, २0१४-१५ पर्यंत प्रत्यक्षात १.१५ लाख कृषीपंपाना वीज जोडणी मिळू शकली. पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पादन हाती येत नसल्याने शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीला जवळ केले आहे. सिंचनाशिवाय शेतमालाचे उत्पादन वाढविणे तसेच फळबाग व भाजीपालावर्गीय शेती करणे अशक्यच आहे. या पृष्ठभूमीवर शेतकरी विहिर, तलाव, शेततळे आदींच्या माध्यमातून हिरवे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. विहिर, तलावातून पाणी शेतात नेण्यासाठी कृषीपंपाला वीजपुरवठय़ाची जोड दिली जाते. कृषीपंपाना वीज जोडणी देण्याची जबाबदारी शासनाने महावितरण कंपनीवर सोपविली आहे. विशेष घटक योजना, रोजगार हमी योजना व शासनाच्या इतर योजनेतून कृषीपंप जोडणीचा लाभ घेतलेल्या लाभार्थींना कृषीपंप विद्युतीकरणाचा प्राधान्यक्रमाने लाभ देण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, २0१३-१४ मध्ये महावितरण कंपनीला राज्यात २.२ लाख कृषीपंपांच्या वीजजोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २0१४-१५ पर्यंत एक लाख १५ हजार कृषी पंपांना वीजजोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषीपंपांच्या विद्युतीकरणाचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्यशासनाने २0१४-१५ मध्ये १५0 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामुळे कृषीपंप विद्युतीकरणाची उद्दिष्टपूर्ती होणे फारशी अवघड बाब नव्हती. कृषीपंप वीजजोडणीअभावी शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न करपून जात आहे.