शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचे नियोजन ‘फेल’!

By admin | Updated: September 17, 2014 02:44 IST

दहा टक्के क्षेत्र पडीक; उशिरा आलेल्या पावसाने बदलली समीकरणे

विवेक चांदूरकर / अकोलायावर्षी पाऊस तब्बल दोन महिने उशिरा झाल्यामुळे संपूर्ण खरीप हंगामाचीच समीकरणे बदलली आहे. कृषी विभागाने केलेले पेरणीचे नियोजन पावसाच्या विलंबामुळे विस्कळीत झाले असून, हंगाम सुरू झाल्यावर तीन महिने उलटल्यानंतरही ४0 हजार हेक्टर म्हणजेच दहा टक्के क्षेत्र पडीक आहे. शेतकर्‍यांनी कपाशीकडे पाठ फिरवित सोयाबीनचीच जास्त पेरणी केली आहे. कपाशी बेल्ट ओळख असलेल्या वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी गत आठ ते दहा वर्षांंपासून आपला मोर्चा सोयाबीनकडे वळविला आहे. वर्‍हाडात साठ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्या त येते. कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात येते. या नियोजनानुसार जिल्हय़ात पेरणी केल्या जाते. यावर्षी मात्र कृषी विभागाचे नियोजन व प्रत्यक्ष शेतकर्‍यांनी केलेल्या पेरणीचा ताळमेळ बसत नाही. उशिरा व अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने संपूर्ण हंगामातील चित्रच बदलले आहे. जिल्हय़ात एकूण ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ४ लाख ८२ हजार ४५२ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. खरीप हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले असले तरी अद्याप १0 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली नसून, हे क्षेत्र पडीक आहे. यावर्षी ४ लाख ४५ हजार ८६ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ९0 टक्के पेरणी झाली आहे.