शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठांना बीजोत्पादनाचे अतिरिक्त उद्दिष्ट!

By admin | Updated: November 23, 2015 02:16 IST

मनुष्यबळ, संसाधनाचा अभाव, मुख्यमंत्री घेणार आज आढावा.

राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांनी बीजोत्पादनात गती वाढवावी व जैविक खताच्या निर्मितीवर सक्षमतेने भर देण्यासाठी शासनाने कृषी विद्यापीठांना तीनपट उद्दिष्ट वाढविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. दरम्यान, कृषी विद्यापीठांकडे असलेले अपुरे मनुष्यबळ व संसाधनाचा अभाव, या उद्दिष्टाला अडसर ठरत असल्याने कृषी विद्यापीठांसमोर पेच निर्माण झाला आहे. राज्यात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख, राहुरीचे (अहमदनगर) महात्मा जोतिबा फुले, परभणी येथील स्व. वसंतराव नाईक मराठवाडा आणि दापोली (रत्नागिरी) येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. पण, या चार कृषी विद्यापीठात प्रचंड मनुष्यबळाचा अभाव असून, एकट्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दोन हजाराच्यावर पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक कृषी शास्त्रज्ञ पदांचा समावेश आहे. शासनाने नवे कृषी महाविद्यालय सुरू केल्याने सध्या कार्यरत पदे या महाविद्यालयाकडे वळविण्यात आले आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त असल्याने कृषी विद्यापीठांना या सर्व बाबींना न्याय देताना कसरत करावी लागत आहे. असे असताना बीजोत्पादनाचे नवे उद्दिष्ट आल्याने कृषी विद्यापीठासमोर पेच निर्माण झाला आहे. बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी कृषी विद्यापीठाचे स्वतंत्र प्रक्षेत्र संचालक व दीडशे कर्मचारी वर्ग असायचा. तथापि प्रक्षेत्र संचालकाचे पद रद्द करण्यात आले असून, कर्मचारी नाहीत. यासोबतच पाणी आणि बीजोत्पादनासाठी लागणारे साधनेही नसल्याने, आहे तेच बीजोत्पादन करणे कृषी विद्यापीठाला जड झाले असताना शासनाने बीजोत्पादनाचे उद्दिष्ट तीनपट वाढवून कृषी विद्यापीठाची परीक्षा घेण्याचे ठरवले असल्याने एकूणच कृषी विद्यापीठांच्या वर्तुळात चर्चेचा विषय आहे. कृषी विद्यापीठाने निर्माण केलेले ब्रिडर व पायाभूत बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) माध्यमातून शेतकर्‍यांना बिनदिक्कत उपलब्ध व्हावीत, हा शासनाचा उद्देश आहे. पण, ही अपेक्षा ठेवताना शासनाने यासाठी लागणार्‍या बाबींवर लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली जात आहे. बीजोत्पादनांचे लक्ष्यांक आणि जैविक खताच्या निर्मितीवर कृषी विद्यापीठांनी लक्ष द्यावे, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सोमवारी आढावा घेणार असल्याचे परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी. वेंकटस्वरलू यांनी स्पष्ट केले.

**पदांचा अभाव

      चारही कृषी विद्यापीठांमध्ये जवळपास पाच ते सहा हजार पदे रिक्त आहेत. अकोला येथील डॉ. पं. दे. कृषी विद्यापीठात १८00 च्यावर पदे रिक्त असून, यात सातशेच्यावर कृषी शास्त्रज्ञांच्या रिक्त पदांचा समावेश आहे.