शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठात शहिदांना सलाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:42 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष करताना हौतात्म्य आलेल्या शहिदांना रविवारी आदरांजली वाहण्यात आली, तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देस्व. राजीव गांधी जयंतीनिमीत्त सद्भावना दिवस साजरा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष करताना हौतात्म्य आलेल्या शहिदांना रविवारी आदरांजली वाहण्यात आली, तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी, याकरिता  आंदोलन १९६८ साली उभारण्यात आले होते आणि या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी २0 ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती. विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुर्‍हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले, तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांचे बलिदान मात्र व्यर्थ गेले नाही. कारण विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २0 ऑक्टोबर १९६९ रोजी झाली. विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणार्‍या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे विशेष सभेचे आयोजन २0 ऑगस्ट रोजी करण्यात येते. रविवारी संपन्न झालेल्या आदरांजली सभेसाठी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, तर विशेष अतिथी म्हणून या आंदोलनाचे साक्षीदार व स्वत: जखमी झालेले अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रवींद्र कन्हैयालाल कानुगो यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रमुख अतिथींनी शहिदांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करीत आदरांजली वाहिली. याप्रसंगी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र नागदेवे यांनी उपस्थितांना सद्भावना शपथ दिली. याप्रसंगी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. दामोदर तामगाडगे, डॉ. विलास खर्चे, डॉ. प्रकाश नागरे, डॉ. ययाती तायडे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, सहायक कुलसचिव डॉ. श्रीकांत आहेरकर, कुलगुरू कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.शशांक भराड, विद्यापीठ अभियंता रामदास खोडकुंभे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, मजूर, विद्यार्थी तथा विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तथा सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण अधिकारी संजय कोकाटे यांनी केले. त्यांना राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठ सुरक्षा विभाग यांच्यासह सामान्य प्रशासन विभाग, विद्यार्थी कल्याण विभाग आदींनी सहकार्य केले. पोलीस प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी बिगुल वाजवून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी गुलाबपुष्प अर्पण करीत शहिदांना वंदन केले.